शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

मागे-पुढे न बघता सुसाट निघालेल्यांना दुप्पट वेगाने गाठतोय मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 9:51 AM

१७ वर्षांत रस्ते अपघातांत २३ लाख जणांचा बळी; गंभीर जखमींची संख्या ८२ लाखांवर

चंद्रकांत दडस

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रस्ते गुळगुळीत असोत, ऐसपैस असोत की सहापदरी असोत. वाहतूक नियमांचे पालन न केल्यास अपघात ठरलेला आहे, हे गेल्या १७ वर्षांतील आकडेवारीतून समोर येते. २००५ ते २०२१ या १७ वर्षांमध्ये देशात रस्ते अपघातात तब्बल २३ लाखजणांचा बळी गेला असून, ८१ लाख ७० हजारांपेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

वाढत्या लोकसंख्येनुसार अपघातांची संख्या दरवर्षी काही प्रमाणात कमी-अधिक होत असली तरी हे प्रमाण २१.६ टक्क्यांवरून वाढून ३७.३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. रस्ते अधिक चांगले झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला. मात्र, हाच वेग अपघाताचे मोठे कारण ठरत असल्याचे केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून समोर येते.

वाहनांची संख्या झाली प्रचंड

१९७० मध्ये प्रति किमी वाहनांची संख्या केवळ १.२ होती. त्यामध्ये दरवर्षी मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. २००० मध्ये हे प्रति १ किमीवर १४.७ वाहने रस्त्यावर होती. २०१० मध्ये हेच प्रमाण २७.९ वर पोहोचले होते. २०१० नंतरही वाहन संख्येत मोठी वाढ झाली आहे.

रस्ते सुधारले, मृत्यू वाढले...

१९७० ते २०१० पर्यंत प्रत्येक वर्षी रस्ते अपघातांमध्ये वाढ होत होती. २०१० मध्ये ही वाढ सर्वाधिक होती. मात्र, रस्ते वाहतुकीचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले गेल्याने २०१० नंतर रस्ते अपघातांचे प्रमाण कमी कमी होत गेले आहे. मात्र, त्याचवेळी २०१० पासून रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण मात्र वाढले आहे.

असे वाढत गेले मृत्यू

वर्ष    अपघात    मृत्यू    जखमी१९७०    ११४    १५    ७० १९८०    १५३    २४    १०९ १९९०    २८३    ५४    २४४ २०००    ३९१    ७९    ३९९ २०१०    ५००    १३५    ५२८ २०२०    ३६६    १३१    ३४८(एक किलोमीटर अंतरात झालेले अपघात)

काय सांगते आकडेवारी

एकूण अपघात -- जखमी -- मृत्यू

  • २००५ -- ४,३९,२५५ -- ४,६५,२८२ -- ९४,९६८
  • २००८ -- ४,८४,७०४ -- ५,२३,१९३ -- १,१९,८६०
  • २०१० -- ४,९९,६२८ -- ५,२७,५१२ -- १,३४,५१३
  • २०१४ -- ४,८९,४०० -- ४,९३,४७४ -- १,३९,६७१
  • २०१८ -- ४,६७,०४४ -- ४,६९,४१८ -- १,५१,४१७
टॅग्स :AccidentअपघातIndiaभारत