शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सनातनला विरोध करणाऱ्यांना मृत्युदंड अन्...! धीरेंद्र शास्त्री यांच्या हिंदू राष्ट्राच्या प्लॅमध्ये काय-काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:57 IST

धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले, दुबई आणि यूएईमध्ये ज्या पद्धतीने कायदे आहेत, तेथे मुस्लीम धर्माला प्राधान्य दिले जाते. त्याच पद्धतीने, हिंदू राष्ट्रात सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचे आणि संस्कृतीचे पालन करण्याचा अधिकार असेल. पण, प्राधान्य सनातनींनाच असेल.

बागेश्वर धाम पीठाधीश्वर आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे हिंदू राष्ट्राच्या मोहिमेसंदर्भात सातत्याने बोलत असतात. त्यांचा दरबार जेथे जेथे लागतो तेथे-तेथे ते हिंदू राष्ट्रासंदर्भात आपले विचार व्यक्त करतात. गेल्या तीन दिवसांपासून ते उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हनुमान कथेचे वाचन करत आहेत. दरम्यान त्यांनी, जेव्हा देश हिंदू राष्ट्र होईल, तेव्हा काय होईल? यासंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले, भारत हिंदू राष्ट्र झाल्यानंतर, सनातन धर्माविरोधात बोलणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असेल. दंड प्रक्रिया बदलेल आणि फाशीची शिक्षा होईल. प्रत्येकाला हिंदू राष्ट्रात राहण्याचा अधिकार असेल, मात्र ज्याप्रमाणे मुस्लीम देशांमध्ये मुस्लीम धर्माच्या अनुयायांना प्राधान्य दिले जाते, त्याचप्रमाणे हिंदू राष्ट्रात सनातन समाजाला प्राधान्य असेल. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा असेल.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, "देश संविधान, हनुमान आणि सनातन यांच्या माध्यमाने चालवला जाईल. केवळ सनातन धर्मच आपल्याला तिसऱ्या महायुद्धापासून वाचवू शकतो. देशाचे विभाजन करू इच्छिणाऱ्यांपासून आपण सावध रहायला हवे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळेल. हिंदू राष्ट्रात जातीभेदावर राजकारण होणार नाही. हिंदू राष्ट्र झाल्यानंतर कोणीही हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. 

धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले, दुबई आणि यूएईमध्ये ज्या पद्धतीने कायदे आहेत, तेथे मुस्लीम धर्माला प्राधान्य दिले जाते. त्याच पद्धतीने, हिंदू राष्ट्रात सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचे आणि संस्कृतीचे पालन करण्याचा अधिकार असेल. पण, प्राधान्य सनातनींनाच असेल. यावेळी त्यांनी, हिंदू राष्ट्रासाठी दिल्ली ते वृंदावन, अशी पदयात्रा काढण्याची घोषणाही केली.

हिंदूंना जागृत करण्यासाठी आपण दिल्ली ते वृंदावन, अशी दुसरी यात्रा काढू. सरकार घोषणा देते, 'बच्चे दो अच्छे' मग 'चच्ची के 30 बच्चे क्यों?' असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. एवढेच नाही तर, हिंदूंच्या मुलांची क्वांटिटी कमी असली तरी, ते त्यांची क्वालिटी चांगली असावी. मुले चारच असावीत पण कट्टर हिंदू असावीत. मानवांत मानवता यावी, यासाठी क्रांती घडवू, असेही धीरेंद्र शासंत्री म्हणाले.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामHindutvaहिंदुत्वHinduहिंदूHinduismहिंदुइझम