शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
3
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
4
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
5
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
6
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण
7
चिडलेल्या स्थितीत दुकानाबाहेर पायऱ्यांवरच का बसून राहिली IAS अधिकारी टीना डाबी?
8
टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 
9
'तुम्हाला भेटायचं राहूनच गेलं..'; रतन टाटांवर धर्मेंद्र यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
10
रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक
11
रतन टाटांनी मान्य केली होती नॅनोतील 'ती' चूक; ट्रकमधून बंगालवरुन गुजरातला हलवला प्रकल्प
12
पैसाच पैसा! घरात सर्वत्र नोटांचे बंडल; नवऱ्यानेच केला लाचखोर इंजिनिअर बायकोचा पर्दाफाश
13
"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?
14
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
15
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
16
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
17
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
18
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
19
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
20
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'

काँग्रेससाठी फाशीचा फंदा!

By admin | Published: October 04, 2015 2:31 AM

बिहार विधानसभा निवडणूक म्हणजे राष्ट्रीय जनता दलासाठी (राजद) ‘करो या मरो’ची लढाई झाली आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या नोटीसला न जुमानता राजद

पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक म्हणजे राष्ट्रीय जनता दलासाठी (राजद) ‘करो या मरो’ची लढाई झाली आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या नोटीसला न जुमानता राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव ही निवडणूक म्हणजे सवर्ण आणि मागासवर्गीयांची लढाई असल्याचे सांगून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांच्या या भूमिकेमुळे महाआघाडीत सहभागी काँग्रेसची अडचण मात्र वाढली आहे.यादव यांच्या जातीय कार्डमुळे काँग्रेसचे नेते आणि उमेदवार चिंतित आहेत. या मुद्द्यावर स्वत:ला राजदपासून दूर ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या शनिवारी कहलगाव (भागलपूर), वजीरगंज (गया) येथील सभा तसेच उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ७ आॅक्टोबरला बछवाडा (बेगुसराय), बरबीघा (शेखपुरा) आणि चेनारी (रोहतास) येथे होणाऱ्या सभांसाठी राजदच्या कुठल्याही नेत्यास औपचारिक आमंत्रण देण्यात आलेले नाही. दुसरीकडे मागासवर्गीयांचे ध्रुवीकरण करण्याच्या राजदच्या उघड प्रयत्नांमुळे सवर्णांची मते गमविण्याच्या भीतीने काँग्रेस नेते सध्या ‘डॅमेज कंट्रोल’मध्ये व्यस्त आहेत. उच्चवर्णीयांमधील गरीब लोकांना आरक्षण देण्यास आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. २००९ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या जाहीरनाम्यातही याचा उल्लेख होता.काँग्रेसचे बहुतांश उमेदवार शहरी आणि निमशहरी भागातील असून, हा या पक्षासाठी सर्वांत चिंतेचा विषय आहे. कारण महाआघाडीत काँग्रेसला मिळालेल्या ४१पैकी १७ जागांवर निकालाचे भवितव्य सवर्णांच्या मतदानावर अवलंबून आहे; आणि या मतदारसंघांमध्ये काँग्रेसची थेट लढत भाजपासोबत आहे. त्यामुळे या जागांवरील काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. सवर्ण आणि मागासवर्गीयांच्या आधारे मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी लालूप्रसाद यादव करीत असलेली वक्तव्ये थांबविण्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठींनी दबाव आणावा अशी या उमेदवारांची इच्छा आहे. यादव यांची बयाणबाजी सुरू राहिल्यास पक्षाचे फार मोठे नुकसान होईल, अशी धोक्याची सूचना अनेक उमदवारांनी पत्राद्वारे दिली आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशीही या उमेदवारांची मागणी आहे. (वृत्तसंस्था)भाजपाची कसोटी- ४१पैकी २८ जागांवर काँग्रेसची लढत भाजपाशी आहे. यापैकी २३ मतदारसंघांत २०१०च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. - याशिवाय पक्षाला संयुक्त जनता दलाकडून अशा १२ जागा मिळाल्या आहेत जेथे गेल्या निवडणुकीत भाजपासोबत असलेल्या संजदचे उमेदवार विजयी झाले होते. २०१० साली काँग्रेसला ४ जागांवर विजय मिळाला होता. परंतु २०१४च्या पोटनिवडणुकीत भागलपूरची जागा ताब्यात आल्याने या पक्षाची सदस्य संख्या ५ झाली. सवर्ण आणि मागासवर्गीयांबद्दल लालूप्रसाद यादव यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. काँग्रेसचा समाजातील प्रत्येक वर्गाला सोबत घेण्यावर विश्वास आहे. पक्षासाठी सांप्रदायिकता आणि विकास हा मुख्य मुद्दा आहे.- प्रेमचंद्र मिश्रा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते