शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

मृत्यू काही मिनिटेच दूर होता; शेख हसिना यांच्या कटू आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 08:22 IST

शेख हसिना यांचा पक्ष ‘आवामी लीग’ने आपल्या फेसबुक पेजवर हसीना यांच्या आवाजातील एक निवेदन पोस्ट केले आहे.

नवी दिल्ली : आपले सरकार उलथविण्यात आल्यानंतर दि. ५ ऑगस्ट रोजी मी आणि माझी छोटी बहीण शेख रेहाना यांनी बांग्लादेशातून पलायन केले तेव्हा मृत्यू आमच्यापासून अवघा काही मिनिटेच दूर होता, असे प्रतिपादन बांग्लादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसिना यांनी केले आहे.

शेख हसिना यांचा पक्ष ‘आवामी लीग’ने आपल्या फेसबुक पेजवर हसीना यांच्या आवाजातील एक निवेदन पोस्ट केले आहे. त्यात त्यांनी ही माहिती दिली. हसिना यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही मृत्यूला अवघ्या २० ते २५ मिनिटांच्या अंतराने गुंगारा देऊन बचावलो. २१ ऑगस्टच्या (२००४) बॉम्ब हल्ल्यातून वाचणे किंवा ५ ऑगस्ट २०२४ च्या संकटातून वाचणे यामागे नक्कीच परमेश्वराची कृपा असली पाहिजे. अन्यथा मी वाचूच शकले नसते. याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते.’

‘राजकीय विरोधकांनी ठार मारण्याचा कट रचला होता’, असे ७७ वर्षीय हसिना यांनी सांगितले. ५ ऑगस्ट २०२४ पासून त्या भारतात आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर माजलेल्या बंडाळीत हसिना यांचे १६ वर्षांपासून सत्तेवर असलेले बांग्लादेशातील सरकार उलथवून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढून भारतात आश्रय घेतला होता. ‘मी दु:खात आहे. मी माझ्या देशाबाहेर, माझ्या घराबाहेर आहे. सर्वकाही जाळण्यात आले आहे’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश