शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

धक्कादायक! कर्जाच्या ओझ्यापायी शेतकऱ्याने केली आत्महत्या; शेतातच खाल्लं सल्फास अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 16:34 IST

Farmer Committed Suicide : कर्जाच्या ओझ्यापायी एका शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्जाच्या ओझ्यापायी एका शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका 40 वर्षीय शेतकऱ्यावर तब्बल साडेतीन लाखांचं कर्ज होतं. बँकेने त्याला याबाबत एक नोटीस देखील पाठवली होती. त्यामुळेच शेतकऱ्यांने टोकाचा निर्णय घेतला. अशोक असं या शेतकऱ्याचं नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून 70 किमी दूर असलेल्या सनावद पोलीस ठाण्याच्या परिसरातील मलगावमध्ये ही घटना घडली. अशोक याने शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्याने मामे भाऊ लखनलाल भायडिया याला फोन करून मी शेतात सल्फास खाल्ल्याचं सांगितलं. हे समजताच लखनलाल आणि त्यांचे काही नातेवाईक हे तातडीने शेतात आले आणि उपचारासाठी अशोकला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

साडे तीन लाखांचं घेतलं होतं कर्ज

शेतकऱ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर उपचारासाठी त्याला इंदूर येथे घेऊन जा असा सल्ला देण्यात आला. मात्र इंदूर येथे घेऊन जातानाच रस्त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. लखनलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोककडे पाच एकर जमीन होती. बँक ऑफ इंडियाच्या बांगरदा शाखेतून त्याने साडे तीन लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्याने काही लोकांकडे पाच लाख उधार मागितलेले. पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. 

नाराज झालेल्या अशोकने त्यामुळेच सल्फास खाल्लं असेल असं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एसपी सिद्धार्थ चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मसगाव येथे एका शेतकऱ्याने सल्फास खाऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर बँकेचं साडे तीन लाखांचं कर्ज होतं आणि त्यासाठी बँकेने त्याला नोटीस देखील पाठवली होती. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Farmerशेतकरी