शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

पाच राज्यांचा आज फैसला

By admin | Published: May 19, 2016 5:42 AM

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज गुरुवारी होणार

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज गुरुवारी होणार असून निवडणूक आयोगाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. सुरक्षा बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पाच राज्यांमध्ये झालेल्या या निवडणुका राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. ममता बॅनर्जी, जयललिता, तरुण गोगोई, एम. करुणानिधी, ओमेन चंडी, व्ही.एस. अच्युतानंदन, बुद्धदेव भट्टाचार्य, सर्वानंद सोनोवाल, एन. रंगासामी आदी दिग्गज नेत्यांच्या भवितव्याचा फैसला या निकालाने होणार आहे.३ वाजेपर्यत सर्व निकालमतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होऊन दुपारी ३ वाजेपर्यत पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने दिली. मतमोजणी सुरू झाल्यावर तासाभरातच कल येणे सुरू होतील आणि १२ वाजेपर्यंत निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे स्पष्ट होईल. या निवडणुकीद्वारे ईशान्येकडील आसाममध्ये आपले सरकार स्थापन करण्याच्या भाजपाच्या दावेदारीवरही स्थिती स्पष्ट होईल. तामिळनाडूतही जयललिता यांच्या नेतृत्वातील अण्णाद्रमुकची सत्ता कायम राखण्यासाठीची कवायत आणि करुणानिधी यांच्या नेतृत्वातील द्रमुककडून मिळालेले आव्हान यात कोण वरचढ ठरणार हे कळेल. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत यूडीएफ आणि डाव्यांच्या एलडीएफमध्ये चुरस आहे. आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागांसाठी ८,३०० उमेदवार रिंगणात होते. पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यांत मतदान पार पडले. राज्यात विधानसभेच्या २९४ जागा होत्या. तामिळनाडूत २३२ जागांसाठी ३७०० च्या वर उमेदवारांनी आपले राजकीय भविष्य अजमावले आहे. >पावसाचे सावटमतमोजणी होणाऱ्या पाचही राज्यांमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे मतमोजणीच्या कामातील आयोगाच्या कर्मचाऱ्यांची बरीच अडचण होणार आहे. विविध वृत्तवाहिन्यांनी निवडणुकीनंतर जाहीर केलेल्या सर्वेक्षणात आसाम, तामिळनाडू आणि केरळमध्ये परिवर्तनाची शक्यता वर्तविली आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र पुन्हा ममता बॅनर्जी यांचा पक्षच पुन्हा सत्तेवर येईल, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे.