शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
2
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
3
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
4
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
5
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
6
विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  
7
खासदारकी तर गेली, आता निदान आमदारकीची इच्छा तरी पूर्ण करा; विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी 
8
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
9
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
10
१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट
11
रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 
12
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते
13
देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 
14
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
15
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
16
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
17
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
18
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
19
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल

घटनापीठाचा निर्णय खंडपीठांना बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 8:48 AM

हरयाणातील एका गावातील रहिवाशांच्या सार्वजनिक वापराच्या जमिनीशी संबंधित एका प्रकरणात एप्रिल २०२२ मध्ये दिलेल्या निकालाचा हवाला सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : घटनापीठाचा निर्णय कमी संख्याबळ असलेल्या खंडपीठांना बंधनकारक असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यासाठी हरयाणातील एका गावातील रहिवाशांच्या सार्वजनिक वापराच्या जमिनीशी संबंधित एका प्रकरणात एप्रिल २०२२ मध्ये दिलेल्या निकालाचा हवाला सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

हरयाणातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ७ एप्रिल २०२२ रोजी दिलेल्या निकालात म्हटले होते की, हरयाणा जमीन कायद्यानुसार मूळ मालकाकडून विशिष्ट कालावधीसाठी घेतलेल्या जमिनीवर ग्रामपंचायत मालकी हक्क सांगू शकत नाही. या जमिनीचे व्यवस्थापन व नियंत्रण ग्रामपंचायत करू शकते, पण ती ग्रामपंचायतीच्या मालकीची होऊ शकत नाही. केवळ वर्तमानातील नव्हे तर भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ही जमीन मूळ मालकाकडून ग्रामपंचायतीने घेतली आहे. त्यामुळे या जमिनीचे व्यवस्थापन व नियंत्रण पुन्हा मालकाकडे जाऊ शकत नाही.  सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की,  निकालाकडे दुर्लक्ष करणे, त्याच्या पूर्णपणे विरुद्ध निकाल देणे ही मोठी त्रुटी आहे.

‘यासाठी काेणत्या कायद्याची गरज नाही’

हरयाणा ग्राम सामायिक जमीन (नियंत्रण) कायदा, १९६१च्या कलम २(ग)च्या उपकलम ६ची कायदेशीर वैधता पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने तपासली होती. त्या न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला होता. 

त्याचा हवाला देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. भूषण गवई व न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, घटनापीठाचा निर्णय कमी संख्याबळाच्या खंडपीठावर बंधनकारक असेल असे सांगण्यासाठी कोणत्याही कायद्याची आवश्यकता नाही. दोन न्यायाधीश असलेले खंडपीठ भगतराम प्रकरणात घटनापीठाने दिलेल्या निकालातल्या पाचव्या परिच्छेदातील उल्लेखांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय