शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

इमरान खान यांच्या 'त्या' विधानामागे काँग्रेसचा डाव - संरक्षणमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 13:54 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलेल्या वक्तव्यामागे काँग्रेसचा डाव असू शकतो अशी शंका संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली - भारतात लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी आले तर चांगले राहील. कारण मोदींमुळे भारत-पाकिस्तानमध्ये शांततेसाठी सकारात्मक पाऊलं उचलता येतील या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलेल्या वक्तव्यामागे काँग्रेसचा डाव असू शकतो अशी शंका संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केली आहे. 

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीबाबत परदेशी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केलं होतं. काश्मीरचा वाद सोडविण्यासाठी पुन्हा भारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आले तर चांगले होईल असं इमरान खान यांनी म्हटलं होतं. मात्र नरेंद्र मोदी सरकारला हटविण्यासाठी पाकिस्तानसोबत मिळून काँग्रेसने हा डाव साधला असा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी केला आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत निर्मला सितारामन म्हणाल्या की, मला माहीत नाही पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी हे वक्तव्य का केलं असावं? काँग्रेसचे अनेक नेते पाकिस्तानात जात असतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्यासाठी मदत करावी अशी मागणी करत असतात. ते नेते नरेंद्र मोदी यांनी हटविण्यासाठी पाकिस्तानची मदत असतात. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेलं विधानाने मला आश्चर्य झालं नाही. कदाचित हा काँग्रेसचा डाव असू शकतो. मात्र माझं हे वैयक्तिक मतं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

परदेशी पत्रकारांनी मागील आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याशी इस्लामाबाद येथे चर्चा केली. यावेळी पत्रकारांनी भारतातील लोकसभा निवडणुकीबाबत आपल्याला काय वाटतं? असा प्रश्न इमरान खान यांना विचारला होता. त्यावेळी भारत-पाक या दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी आणि काश्मीर मुद्द्याचं निरसन करण्यासाठी निवडणुकीनंतर भारतात नरेंद मोदी पुन्हा पंतप्रधान बनले तर चांगले राहील असं वक्तव्य केलं होतं. 

तसेच भारत पाकिस्तानवर पुन्हा हल्ला करु शकतो. १६ ते २० एप्रिल दरम्यान हा हल्ला होऊ शकतो असं पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेला आरोपही संरक्षणमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान