शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 2:15 PM

'पाकिस्तानात सध्या स्थिती वाईट आहे, त्यामुळे पीओकेत भारतात सामील होण्याची मागणी होत आहे.'

Rajnath Singh on PoK: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता सोमवारी(दि.26) त्यांनी पाकव्याप्त काश्मीर (POK) संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. जम्मूमध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एका परिषदेत बोलताना ते म्हणाले की, 'आता पीओके भारतात विलीन करण्याची मागणी होत आहे, तिथे आम्हाला फार काही करण्याची गरज नाही.' यावेळी संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानवर दहशतवादाच्या मुद्द्यावरुन टीकाही केली. 

पीओकेबाबतराजनाथ सिंह म्हणाले की, तेथील लोक सतत भारतात सामील होण्याची मागणी करत आहेत, अशा परिस्थितीत आम्हाला फार काही करण्याची गरज नाही. जम्मूमध्ये बोलताना संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तान आणि चीनबाबत वक्तव्य केले. आमच्या सैन्याने एलएसीवर चीनला चोख प्रत्युत्तर दिल्याचे ते म्हणाले.पाकिस्तानच्या भूमीवरून पसरलेल्या दहशतवादाबद्दल राजनाथ सिंह म्हणाले की, 2019 मध्ये पुलवामा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान मोदींनी दहा मिनिटांत कारवाईचा निर्णय घेतला. 

भारतीय लष्कराने सीमेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला. गरज पडल्यास सीमेपलीकडे जाऊनही भारत शत्रूंचा नायनाट करू शकतो, असे राजनाथ यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपासून पाकिस्तानची स्थिती चांगली नाही, राजकीय आघाडीवर पाकिस्तानची स्थिती अतिशय वाईट आहे. पीओकेमध्ये वेळोवेळी पाकिस्तानी राजवटीच्या विरोधात निदर्शने होत असतात. यामुळेच भारत सरकार पीओकेच्यावर लक्ष ठेवून आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तानPOK - pak occupied kashmirपीओकेJammu Kashmirजम्मू-काश्मीर