शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

"केजरीवाल काय आहेत हे अण्णा हजारेंनी सांगितलंय"; दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांचा आपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:47 IST

CM Devendra Fadnavis: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.

Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहिणी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी विचार न करता बोलल्याचा आणि देशाच्या राजधानीतील जनतेला विकासाची खोटी आश्वासने दिल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. केजरीवाल हे काय आहेत हे अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केजरीवालांवर खोटी आश्वासने देण्याचा आरोप केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीतील प्रदूषण संकटाचे कारण हे सरकारची निष्क्रियता असल्याचे म्हटलं. दिल्ली विधानसभा निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवार विजेंदर गुप्ता यांच्या समर्थनार्थ उत्तर-पश्चिम रोहिणी विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांचाही उल्लेख केला.

"दिल्लीची निवडणूक ही लोकांना वाईट प्रशासनापासून मुक्ती देण्यासाठी आहे. केजरीवाल काय आहेत हे तुला जाणून घ्यायचे असेल तर मी महाराष्ट्रातून येतो आणि अण्णा हजारे यांच्यासोबत माझे जवळचे संबंध आहेत. मी आताच त्यांना भेटून येत आलोय. जगातल्या सगळ्यात बेईमान माणूस कोणी असेल तर ते अरविंद केजरीवाल आहेत असं मी नाही तर अण्णा हजारे म्हणतात," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

ऑलिम्पिकमध्ये भ्रष्टाचार करण्याची शर्यत झाली तर केजरीवाल सुवर्णपदक जिंकले असते. दिल्लीचा जलद विकास व्हावा यासाठी त्यांनी मतदारांना दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन करावं लागेल. आप सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे दिल्लीला गटार, गलिच्छ पाणी आणि प्रदूषित हवा यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतोय, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी २०११ मध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर अल्पावधीतच ते प्रसिद्ध झाले. त्यानंतर केजरीवाल यांनी राजकारणाचा मार्ग निवडला. त्यानंतर केजरीवाल आणि अण्णा हजारे वेगळे झाले.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसArvind Kejriwalअरविंद केजरीवालanna hazareअण्णा हजारे