शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

"…म्हणून दिल्लीत भाजपा करतोय काँग्रेसला फंडिंग’’, मुख्यमंत्री आतिशी यांचा सनसनाटी आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 14:06 IST

Delhi Assembly Election 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी काँग्रेस आणि भाजपावर सनसनाटी आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीत भाजपा आणि काँग्रेसचं साटंलोटं असून, निवडणूक लढवण्यासाठी भाजपा काँग्रेसला फंडिंग करत असल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे. 

पुढच्या महिना दोन महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे सध्या दिल्लीतील राजकीय वातावरण तापलेलं आहे. मागच्या दहा वर्षांपासून दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाने विजयी हॅटट्रिक करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर देशाच्या राजधानीचं क्षेत्र असलेल्या दिल्लीतील सत्ता मिळवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांकडूनही तयारी सुरू आहे. यादरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी काँग्रेस आणि भाजपावर सनसनाटी आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीत भाजपा आणि काँग्रेसचं साटंलोटं असून, निवडणूक लढवण्यासाठी भाजपा काँग्रेसला फंडिंग करत असल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे. 

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी ह्या आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपाकडून काँग्रेसला आर्थिक रसद पुरवली जात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित आणि अजय माकन यांच्याविरोधात कारवाई केली गेली पाहिजे. यावेळ पत्रकार परिषदेमध्ये आतिशी यांच्यासोबत आपचे नेते संजय सिंह हे सुद्धा उपस्थित होते. 

त्यांनी पुढे सांगितले की, काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपाकडून पैसे मिळाले आहेत. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची मतांचं विभाजन घडवण्याच्या योजनेवर काँग्रेसचे नेते काम करत आहेत. तसेच काँग्रेसचे नेते अजय माकन हे भाजपाने दिलेल्या स्क्रिप्टचं वाचन करत आहेत, असा आरोपही आतिशी यांनी केला.

आतिशी पुढे म्हणाल्या की, बुधवारी काँग्रेस पक्षाने अरविंद केजरीवाल आणि माझ्याविरोधात एफआयआर नोंदवली. मात्र आम्ही कुठलीही एफआयआर आजपर्यंत नोंदवलेली नाही. काँग्रेसच्या उमेदवारांचा खर्च हा भाजपाकडून केला जात असल्याची माहिती आम्हाला अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये संदीप दीक्षित आणि फरहाद सुरी हे प्रमुख आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याकडून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत प्रचार का करवून घेतला, असा सवालही आतिशी यांनी विचारला आहे.

काँग्रेसने हे साटंलोटं भाजपाला जिंकवण्यासाठी केलं होतं. जर असं साटंलोटं नसेल तर अजय माकन आणि युवक काँग्रेसच्या नेत्यांविरोधात कारवाई करण्यात यावी. संदीप दीक्षित आणि फरहाद सुरी यांची निवडणूक कोण लढवत आहे, असा सवालही आतिशी यांनी यावेळी विचारला. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपा