शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

दिल्लीत भाजप सरकार आलं तर काय-काय मिळणार? अमित शाह यांनी 'संकल्प पत्र पार्ट-3' जारी करत सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 18:17 IST

यात भाजपने यमुना नदी स्वच्छ करण्याचे, अनधिकृत वसाहतींना मालकी हक्क देण्याचे, कामगारांसाठी जीवन विमा आणि तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.

दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक मैदानात उतरलेले सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ-मोठ्या घोषणा करताना दिसत आहेत. यातच आज (शनिवारी) केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांनी भाजपचे संकल्प पत्र -३ सादर केले. यात भाजपने यमुना नदी स्वच्छ करण्याचे, अनधिकृत वसाहतींना मालकी हक्क देण्याचे, कामगारांसाठी जीवन विमा आणि तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेली अमित शाह म्हणाले, "आज मी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या संकल्पाचा शेवटचा भाग प्रसिद्ध करत आहे. या ठिकाणी मी कोणत्याही पक्षाचे नाव घेणार नाही. मात्र, आम्ही जी आश्वासने देतो, ती पूर्ण करतो. अनेकांनी दिलेल्या सूचनांनुसार, हे संकल्प पत्र तयार करण्यात आले आहे." यासंदर्भात सविस्तर बोलताना शाह म्हणाले, "जर भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला, तर १७०० अनधिकृत वसाहतींना संपूर्ण मालकी हक्क दिला जाईल. दिल्लीमध्ये १३००० दुकाने सील आहेत, ती ६ महिन्यांच्या आत पुन्हा खुली केली जातील. निर्वासित वसाहतींमध्ये भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जमिनींना मालकी हक्क दिले जातील."

अमित शाह पुढे म्हणाले, "दिल्लीमध्ये भव्य महाभारत कॉरिडोर विकसित केला जाईल. मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधी आणि वकिलांना १० लाख रुपयांपर्यंत जीवन विमा आणि १० लाख रुपयांपर्यंत आरोग्य आणि अपघात विमाही दिला जाईल."

यमुना रिव्हरफ्रंट तयार करणार - अमित शहा म्हणाले, भाजप सत्तेत आल्यानंतर, आपण साबरमती रिव्हर फ्रंटप्रमाणेच यमुना रिव्हर फ्रंट तयार करणार आहोत. हे काम तीन वर्षांत पूर्ण होईल. अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना शाह म्हणाले, "केजरीवाल म्हणाले होते की ते ७ वर्षांत यमुना पूर्णपणे स्वच्छ करतील आणि दिल्लीतील लोकांसमोर यमुनेत डुबकी मारतील. मी केजरीवालजींना आठवण करून देऊ इच्छितो की केजरीवालजी, लोक आपल्या जगप्रसिद्ध डुबकीची वाट बघत आहेत.

अमित शाह पुढे म्हणाले, "आम्ही तीन वर्षांत यमुना नदी स्वच्छ करणार आणि साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर एक रिव्हरफ्रंट विकसित करणार. मी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबाला तीन वर्षांनंतर, यमुनेत डुबकी मारण्यासाठी आमंत्रित करतो"

तरुणांसाठी नोकऱ्या आणि वाहतूक क्षेत्रात गुंतवणूक -भाजपने ५० हजार तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासनही दिले आहे. याच बोरबर, १३००० बसेस ई-बसमध्ये रूपांतरित केल्या जातील. २०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकात्मिक सार्वजनिक वाहतूक नेटवर्क, दिल्ली १००% ई-बस शहर बनेल, मेट्रो फेज ४ चे काम लवकरच पूर्ण होईल, मेट्रो आणि बसेस २४x७ उपलब्ध असतील. याशिवाय, टेक्सटाइल वर्कर्सना १० लाख रुपयांचा जीवन विमा आणि ५ लाख रुपयांचा अपघात विमा देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Amit Shahअमित शाहBJPभाजपा