शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"जनतेनं केजरीवाल यांना मुक्त केलं, आता आरामात..."; दिल्लीच्या निकालावर काय म्हणाल्या स्मृती इराणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 20:00 IST

"सत्तेच्या अहंकारात बुडालेले अरविंद केजरीवाल आज पराभूत झाले आहेत. मलावाटते की, आपल्या दुष्कृत्यांबद्दल आरामात तुरुंगात जाण्यासाठी जनतेने त्यांना मुक्त केले आहे."

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यात भाजपला मोठा विजय मिळाला आहे. यासंदर्भात, पक्षाने अत्यंत उत्तम कामगिरी केली, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या स्मृती इराणी यांची दिली आहे. त्या म्हणाल्या, "अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, आपण भारतीय राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी राजकारणात आलो आहोत. मात्र तसे करण्यात ते अपयशी ठरले आणि स्वतःच दारू घोटाळ्याचे आरोपी बनले. केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या विकास कामांनाही विरोध केला. मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानते की, त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व आणि सुशासनावर विश्वास दाखवला."

जनतेने केजरीवाल यांना मुक्त केले... - माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, "भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर आज दिल्लीत एक इतिहास रचला आहे. मी दिल्लीतील जनतेचे आभार मानते की, त्यांनी पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीवर विश्वास दाखवला आणि भाजपला सेवा करण्याची संधी दिली. सत्तेच्या अहंकारात बुडालेले अरविंद केजरीवाल आज पराभूत झाले आहेत. मलावाटते की, आपल्या दुष्कृत्यांबद्दल आरामात तुरुंगात जाण्यासाठी जनतेने त्यांना मुक्त केले आहे."

 केजरीवाल नवी दिल्लीतून पराभूत -आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रवेश वर्मा यांनी ४,०८९ मतांनी पराभव केला आहे. हा सत्ताधारी आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, वर्मा यांना 30088 मते मिळाली आहेत, केजरीवाल यांना 25999 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांना 4568 मते मिळाली आहेत.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Smriti Iraniस्मृती इराणीAAPआपBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी