शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

Delhi Asssembly Elections 2020: काँग्रेस उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 11:26 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तिसरी यादी जाहीर केली आहे.

ठळक मुद्देदिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसनं पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसनं ओखलामधून परवेझ हाश्मीला मैदानात उतरवलं आहे.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसनं पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसनं ओखलामधून परवेझ हाश्मीला मैदानात उतरवलं आहे. तसेच मादीपूरमधून जयप्रकाश पवार आणि विकासपुरीमधून मुकेश शर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्याशिवाय ब्रिजवासन आणि महरौलीमधूनही उमेदवारांची घोषणा केली आहे. या दोन्ही जागांवरून काँग्रेसनं क्रमशः प्रवीण राणा आणि मोहिंदर चौधरी यांना तिकीट दिलं आहे.काँग्रेसनं आतापर्यंत 70 पैकी 66 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तत्पूर्वी शनिवारी सायंकाळी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात 54 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये तब्बल 32 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर 14 आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीनंतर त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपडा यांची मुलगी शिवानी चोपडांपासून, तर प्रचार समिती प्रमुख कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम आझाद यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. जवळपास डझनभर असे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी पक्षातील नेत्यांच्या मुला-मुलींना, पत्नी, सून इत्यादींना तिकिट देण्यात आले आहे.दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजपाने 17 जानेवारीला 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर भाजपाने उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर केली असून, केजरीवालांविरोधात सुनील यादव यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. भाजपाने राहिलेल्या 10 जागांवर तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना हरीनगर, नांगलोई जाटहून सुमनलता शौकीन, राजौरी गार्डनहून रमेश खन्ना, नवी दिल्लीहून सुनील यादव, शाहदराहून संजय गोयल, कृष्णानगरहून अनिल गोयल, महरौलीहून कुसुम खत्री, कालकाजीहून धर्मवीर सिंह आणि कस्तूरबानगरहून रवींद्र चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे. तर दिल्लीमध्ये युतीमुळे दोन जागा जदयूला देण्यात आल्या आहेत. यामध्ये संगम बिहार आणि बुराडी या जागा आहेत. तर एक जागा लोजपाला सोडण्यात आली आहे. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकcongressकाँग्रेसPoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधी