शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 18:34 IST

उपराज्यपालांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री आतिशी यांचे सामान बाहेर काढल्याचा आरोप आपने केला आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. पीडब्ल्यूडीने 6 फ्लॅग स्टाफ रोड येथील मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान सील केले आहे. विभागाने बंगल्याच्या गेटला दोन कुलूपही लावले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे सरकारी निवासस्थान रिकामे करण्यात आले होते. आतिशी मुख्यमंत्री झाल्यानंतर या घरात राहायला आल्या, पण आता अचानक पीडब्ल्यूडीने हे घर सील केले आहे.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकामे करणे आणि हस्तांतरित करण्याबाबत वाद आहे, त्यामुळेच पीडब्ल्यूडीने ही कारवाई केली आहे. याशिवाय पीडब्ल्यूडीचे दोन विभाग अधिकारी आणि दिल्लीच्या दक्षता विभागातील अरविंद केजरीवाल यांचे माजी विशेष सचिव यांना योग्य हस्तांतरित करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, पीडब्ल्यूडीच्या कारवाईनंतर आम आदमी पक्षाने उपराज्यपालांवर आरोप केले. उपराज्यपालांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री आतिशी यांचे सर्व सामान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून बाहेर काढल्याचा आरोप आपने केला आहे. 

दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांवर बेकायदेशीरपणे बंगल्याचा ताबा घेतल्याचा आरोप केला आणि तो सील करण्याची मागणी केली. तर, दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, अरविंद केजरीवाल, अखेर तुमच्या पापांचे भांडे भरले आहे. तुमचा भ्रष्ट शीशमहल अखेर सील करण्यात आला आहे. आज सकाळीच भाजपने भ्रष्ट शीशमहल सील करण्याची मागणी केली होती. 

ज्या बंगल्याचा प्लॅन पास झालेला नव्हता, ज्याला एनओसी मिळालेली नव्हती, त्यात तुम्ही कसे राहात होता? चोर दरवाज्याने तुम्ही नवीन मुख्यमंत्र्यांना घुसवण्याचा प्रयत्न करत होता. त्या बंगल्यात कोणती गुपिते दडवली आहेत. सरकारी खात्याला बंगल्याची चावी न देता, आत घुसण्याचा प्रयत्न करत आहात. संपूर्ण दिल्ली हे पाहत आहे. दिल्लीतील या शीशमहलमधील बंगला आता सील करण्यात आला आहे आणि मला आशा आहे की त्याची सखोल चौकशी केली जाईल, अशी टीका त्यांनी केली.

आतिशी सोमवारीच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहायला गेल्यादिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी सोमवारी सामानासह उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाइन्स भागात असलेल्या बंगल्यात शिफ्ट झाल्या होत्या. या बंगल्यात अरविंद केजरीवाल आपल्या कुटुंबासह 9 वर्षांपासून राहत होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ते रिकामे केले होते. बुधवारी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत आतिशीला बंगला अद्याप दिला नसल्याचा आरोप करत भाजप बंगला बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. बंगल्याच्या परिसरात असलेले मुख्यमंत्र्यांचे कॅम्प ऑफिस रिकामे करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीAtishiआतिशी