शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 13:07 IST

Kanhaiya Kumar And Manoj Tiwari : ईशान्य दिल्लीतील काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे उमेदवार कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. य़ाच दरम्यान, ईशान्य दिल्लीतील काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे उमेदवार कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?, ते फक्त बोलत आहेत. त्यांनी देशासाठी काहीही केलेलं नाही. ईशान्य दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनी गेल्या 10 वर्षांत काहीही केलेलं नाही.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत काही ना काही बोलत असतात. कधी मन की बात, कधी नोटाबंदीवर, कधी जीएसटीवर, कधी हिंदी-मुस्लिमवर, ते चांगल्या गोष्टींवरही बोलतात. त्यांनी एक वचन दिलं होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. आता तर त्यांच्या दुसरा कार्यकाळ देखील समाप्त होण्याच्या जवळ आला आहे. त्यामुळे हे वचन कधी पूर्ण करणार?"

"दोन कोटी नोकऱ्यांचं काय झालं?"

"पंतप्रधानांनी तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. गेल्या 10 वर्षांपासून ते हीच गोष्ट रिपीट करत आहेत. ईशान्य दिल्लीतील लोकांनी भाजपा खासदार मनोज तिवारी यांना गेल्या दहा वर्षात नेमकं काय केलं? असा प्रश्न विचारा" असं देखील कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे. 

ईशान्य दिल्लीत ट्रॅफिक, पाणी साचणं आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या गंभीर समस्या आहेत. महागाई आणि बेरोजगारीच्या संकटात या भागातील लोक मोठ्या अडचणीत जगत आहेत. आता पंतप्रधान आणि त्यांच्या खासदारांनी काम करण्याची नाही, तर आतापर्यंत काय काम केलं ते दाखवून देण्याची वेळ आली आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी काम केलं नसेल तर त्यांना पद सोडावं लागेल असं म्हटलं आहे. ईशान्य दिल्लीतील भाजपा खासदार मनोज तिवारी यांचा पराभव करण्यासाठी कन्हैया कुमार जोरदार प्रचार करत आहेत. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी