शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

IASच्या तयारीसाठी गेला होता दिल्लीला, तिसऱ्यांदा बनला आपचा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 14:13 IST

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात पुन्हा एकदा आपनं बाजी मारली आहे.

नवी दिल्लीः देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात पुन्हा एकदा आपनं बाजी मारली आहे. या निवडणुकीत दिल्लीकरांनी पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्या 'आम आदमी पार्टी'ला  एकहाती सत्ता दिली. दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी 62 जागांवर आपचा विजय झाला असून, भाजपाला फक्त आठ जागा राखता आल्या आहेत. तर काँग्रेसला या निवडणुकीतही भोपळाही फोडता आलेला नाही. विशेष म्हणजे आपच्या विजयानंतर उत्तर प्रदेशमधल्या संतकबीरनगर जिल्ह्यात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. याचं कारणही खास आहे. खरं तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत संतकबीरनगरमधले मेंहदावलचे रहिवासी अखिलेश त्रिपाठी यांनी लागोपाठ तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. ते मॉडल टाऊन जागेवरून सलग तिसऱ्यांदा आम आदमी पार्टीकडून आमदार झाले आहेत. अखिलेश यांनी आपच्या विरोधात बंडखोरी केलेल्या भाजपाच्या कपिल मिश्रा यांचा 12 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. अखिलेश हे दिल्लीत आयएएसच्या तयारीसाठी आले होते. मुलगा आमदार झाल्याचं समजल्यानंतर कुटुंबीयांसह जिल्ह्यातील लोकांनी आनंद साजरा केला आहे.सेवानिवृत्त झालेले शिक्षक वडील अभयनंदन त्रिपाठी म्हणाले, जो पक्ष देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे, त्या पक्षासोबत माझा मुलगा असल्यानं मी आनंदी आहे. मॉडल टाऊन विधानसभा क्षेत्रातून विजयी झालेले अखिलेश हे आपच्या संस्थापक सदस्य नेत्यांपैकी एक आहेत. ते पहिल्यांदा 2013मध्ये, त्यानंतर 2015मध्ये आणि आता 2020मध्ये आपकडून मॉडल टाऊन जागेवरून निवडणुकीत उतरले आणि विजय झालेले आहेत.प्रत्येक वेळी ते चांगल्या मताधिक्क्यानं निवडून आले आहेत. संतकबीरनगरमधल्या अखिलेश त्रिपाठी यांनी 1998मध्ये शालेय शिक्षण आणि 2000मध्ये इंटरमीडिएटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ईसीसी कॉलेज इलाहाबादमधून 2003मध्ये बीए आणि वर्षं 2005मध्ये प्राचीन इतिहास विषयावर अध्यापन केलं आहे. 2006मध्ये इलाहाबादमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. वर्षं 2007मध्ये दिल्लीत आयएएसची तयारी करण्यासाठी आले होते. दिल्लीत गेल्यानंतर अखिलेश अण्णा हजारेंच्या आंदोलनानं प्रभावित होऊन त्यांच्याशी जोडले गेले. त्याचदरम्यान ते एका सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे अरविंद केजरीवालांसोबत जोडले गेले. आपकडून त्यांना मॉडल टाऊन विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी देण्यात आली आणि जनतेनंही त्यांच्यावर चांगला विश्वास दाखवलेला आहे. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवाल