शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मध्य प्रदेश, राजस्थानसारखेच मोदी दिल्लीतही सरप्राईज देणार? आपला 'खास' मुख्यमंत्री करणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:14 IST

Delhi Election Result News: दिल्लीत भाजपा तब्बल २७ वर्षांनी सत्तेत येत आहे. थोड्याच वेळात मोदी दिल्लीवासियांना संबोधित करणार आहेत.

दिल्लीत भाजपा तब्बल २७ वर्षांनी सत्तेत येत आहे. आधी १५ वर्षांचे काँग्रेसची सत्ता आपने मोडीत काढली होती. त्या आपने तीन निवडणुका लढल्या, ११ वर्षे सत्ता उपभोगली. आता आपकडून सत्ता हिसकावून घेत भाजपाने दिल्लीत मोठी मुसंडी मारली आहे. थोड्याच वेळात मोदी दिल्लीवासियांना संबोधित करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता फार कमी असली तरी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानप्रमाणे मोदी दिल्लीत मोठे सरप्राईज देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

सत्ता कोणाच्याही अधिपत्त्याखाली आली तरी भाजपाने गेल्या काही काळापासून त्या व्यक्तीला बाजुला करून नवा चेहरा दिलेला आहे. दिल्लीत काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. परंतू, भाजपा खासदार मनोज तिवारी यांचे नाव सर्वात पुढे असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

दिल्ली निवडणुकीत भाजपाने प्रचंड सोशल इंजिनिअरिंग केलेले आहे. दिल्ली निवडणुकीत पुर्वांचलच्या लोकांची मते महत्वाचा मुद्दा बनली होती. भाजपा आणि आप या दोघांनीही एकमेकांवर या मतदारांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. केजरीवालांनी पुर्वांचली व्होट बँकेला आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक आश्वासने दिली होती. मनोज तिवारी हे स्वत:पुर्वांचलचे आहेत. त्यांना जर मुख्यमंत्री पद दिले तर भाजपाचा तो मास्टरस्ट्रोक ठरणार आहे. भविष्यात बिहार निवडणूक येत आहे. दिल्लीतून बिहारमध्ये परिणाम करणारा निर्णय ठरू शकतो. 

एका पुर्वांचली व्यक्तीला दिल्लीचा मुख्यमंत्री केले तर त्याचा फायदा बिहारमध्ये होण्याचा अंदाज भाजपला आहे. सध्या बिहारच्या जिवावर केंद्रात भाजपा सत्तेत आहे, जास्त जागा असूनही भाजपा बिहारमध्ये छोट्या भावाच्या भुमिकेत आहे. महाराष्ट्रासारखीच मोठ्या भावाच्या भुमिकेत जाण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. यासाठी पूर्वांचली चेहरा मदत करू शकतो. स्वत: तिवारी यांनी देखील मी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा