शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

"तुम्हाला यमुनेने शाप दिला"; राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आतिशी यांना नायब राज्यपालांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:51 IST

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आतिशी यांना यमुनेच्या प्रदूषणावरुन नायब राज्यपालांनी चांगलेच सुनावले.

Delhi Election Results: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. आम आदमी पक्षाला केवळ २२ जागांवर यश  मिळवता आलं. या निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल,  मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज आणि इतर अनेक बडे नेतेही पराभूत झाले. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पराभव स्वीकारत लोकांसाठी काम करत राहू असं म्हटलं. दुसरीकडे आपच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी विजय मिळवला आहे. आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधुरींचा पराभव केला. त्यानंतर आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नायब राज्यपालांकडे सोपवला. यावेळी राज्यपालांनी तुम्ही यमुनेच्या शापामुळे हरलात असं विधान केलं.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी व्हीके सक्सेना यांनी यमुनेच्या प्रदूषणावरुन आतिशी यांना चांगलेच सुनावले. तुम्हाला यमुना मातेने शाप दिला आहे. यमुना स्वच्छ करण्यासाठी सरकारने सक्रिय पावले उचलायला हवी होती, असं व्हीके सक्सेना यांनी म्हटलं. आतिशी यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान एलजी सक्सेना यांनी वायू प्रदूषणाबाबत झालेल्या आरोप-प्रत्यारोपांचाही उल्लेख केला. राज्यपाल सचिवालयाने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी रचनात्मक पावले उचलण्यासाठी अनेक पत्रे लिहिली होती.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तुम्हाला यमुना मातेचा शाप आहे. तुम्ही लोकांनी यमुना स्वच्छ करायला हवी होती. त्यासाठी पावले उचलायला हवी होती. आमच्या सचिवालयाने अनेक उपायसुद्धा सुचवले होते, असं नायब राज्यपाल व्हीके सक्सेना म्हणाले. या विधानावर आतिशी किंवा आम आदमी पक्षाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

२७ जानेवारी रोजी एका प्रचार सभेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाकडून दिल्लीला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजप आपल्या गलिच्छ राजकारणाने दिल्लीतील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवू इच्छित आहे. हरियाणातून पाठवण्यात येणाऱ्या पाण्यात विष मिसळले जात आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, सप्टेंबर २०२४ मध्ये पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्रीपद सोडले होते. पक्षाने आतिशी यांना नवे मुख्यमंत्री केले होते.  निवडणुकीतील पराभवानंतर आतिशी यांनी रविवारी लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल