शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Delhi Elections 2024: दिल्लीत आपचा दारूण पराभव, काँग्रेसचे उद्दिष्ट पूर्ण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:26 IST

Delhi Election Result 2025: २०१३ मध्ये पहिल्यांदा दिल्लीत सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. आपच्या पराभवावर काँग्रेस नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. 

AAP-Congress Delhi Election 2025: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. या पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडत अरविंद केजरीवालांनी स्वबळाचा नारा दिला. तेव्हापासूनच काँग्रेस बदल्याच्या भावनेने कामाला लागल्याचे दिसले. राहुल गांधींपासून काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी केजरीवालांना लक्ष्य केले. निवडणुकीचे निकाल लागले. काँग्रेसला या निवडणुकीतही अपयश आले, पण नेत्यांच्या निकालाबद्दलच्या प्रतिक्रिया उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे अप्रत्यक्षपणे सांगणाऱ्या आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'२०१३ मध्ये आम आदमी पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा त्यावेळचा निर्णय हे काँग्रेसच्या पि‍छेहाटीचं सर्वात मोठं कारण होतं', असे काँग्रेसचे नेते अजय माकन म्हणालेले. त्यानंतर काँग्रेसनेच आम आदमी पक्षाला भ्रष्टाचार आणि असुविधांच्या मुद्द्यांवरून घेरलं. इंडिया आघाडीत फूट पडल्याचा मेसेजही यातून स्पष्टपणे गेला. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीआधीपासूनच काँग्रेसच्या दिल्लीतील ऱ्हासासाठी नेते आम आदमी पक्षाला जबाबदार ठरवू लागले होते. त्यामुळे प्रचारात भाजप विरुद्ध आप असे चित्र होतेच, त्याचबरोबर आप विरुद्ध काँग्रेस असा संघर्षही दिसला होता. 

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसला दिल्लीत आपचे सरकार नको होते, अशी भूमिका आता काँग्रेसकडून मांडली जाताना दिसत आहे. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी दिल्लीत सत्तांतर होणं अपेक्षित होतं, अशीच भूमिका मांडली आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीबद्दल काँग्रेसचे नेते काय बोलले?

काँग्रेसच्या महासचिव आणि खासदार प्रियांका गांधी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर बोलताना म्हणाल्या की, "दिल्लीतील लोकांना बदल हवा होता. त्यांनी बदलासाठी मतदान केलं. लोकांसोबतच्या बैठकीतून हे दिसत होतं", असे म्हणत त्यांनी आपचा पराभव अपेक्षित होत असेच प्रत्यक्षपणे अधोरेखित केले. 

इतकंच नाही, तर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही अशाच आशयाची भूमिका मांडली. "आम आदमी पक्षाला विजयी करण्याची जबाबादारी आम्ही उचललेली नाही. आम्ही काही एनजीओ नाही आहोत. आम्ही राजकीय पक्ष आहोत."

अलका लांबा म्हणाल्या की, "ज्यांनी दिल्लीचे नुकसान केले आहे, दिल्ली त्यांचे नुकसान केले आहे." 

काँग्रेस-आप वैर वाढणार?

आप आदमी पक्षाची दिल्लीतील सरकार गेलं. त्यानंतर काँग्रेस आणि आपमधील राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमुळे आपला फटका बसला, तर त्याचा फायदा थेट भाजपला झाल्याचे आकेडवारीतून दिसत आहे. 

हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपासूनच अरविंद केजरीवाल काँग्रेसविरोधात जाहीरपणे बोलू लागले होते. आता केजरीवालांनाच सत्तेतून पायउतार व्हावं लागल्याने दोन्ही पक्षातील वैर वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपcongressकाँग्रेस