शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'
2
शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?
3
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
4
ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."
5
रामलीलामध्ये खुर्चीवर बसल्या प्रकरणी दलिताला मारहाण, अपमानामुळे केली आत्महत्या; पोलिसांवर गंभीर आरोप
6
Vastu Tips: दररोज रांगोळी काढण्याचे शारीरिक, मानसिक, आर्थिक लाभ वाचून आश्चर्यचकित व्हाल!
7
Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
8
'सिंघम अगेन'साठी अजय देवगणनं घेतलं तगडं मानधन, इतर कलाकारांनी किती घेतली फीस?
9
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
10
'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
11
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
12
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...
13
PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती
14
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
15
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
16
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?
17
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
18
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
19
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
20
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला

'जगाला चांगला संदेश जाणार नाही', यमुनेची पातळी वाढली; केजरीवालांचे अमित शहांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 4:43 PM

राजधानी दिल्लीत 45 वर्षात पहिल्यांदाच यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे.

Delhi Flood: राजधानी दिल्लीत गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच यमुना नदीने विक्रमी जलपातळी गाठली आहे. यामुळे दिल्लीतील सखल भाग पुराच्या पाण्यात बुडाला आहे. रहिवासी भागातही पाणी तुंबल्यामुळे अनेक ठिकाणी घरे-दुकाने पाण्याखाली गेली आहेत. नदीची पातळी सातत्याने वाढत असल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी G-20 परिषदेचाही हवाला दिला आहे.

सीएम केजरीवाल यांनी आपल्या पत्रात लिहिले की, आज (बुधवार) दुपारी 1 वाजता दिल्लीतील यमुनेची पातळी 207.55 मीटरवर पोहोचली आहे. ही धोक्याच्या चिन्हाच्या (205.33 मीटर) वर आहे. याआधी 1978 मध्ये यमुनेची कमाल पातळी 207.49 मीटर पोहोचली होती. त्यावेळी दिल्लीत पूर आला होता आणि परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. आता पाण्याची पातळी 207.55 मीटरवर पोहचल्यामुळे दिल्लीत पूराचा धोका वाढला आहे. 

जलपातळी 207.72 मीटरपर्यंत पोहोचेलते पुढे म्हणाले की, केंद्रीय जल आयोगाच्या नुकत्याच आलेल्या अंदाजानुसार यमुनेची पातळी आज रात्री 207.72 मीटरपर्यंत पोहोचेल, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. दिल्लीतील पावसामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी वाढत नसून, हरियाणातील हथिनीकुंडमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पाणीपातळी वाढत आहे. तुम्हाला विनंती करतो की, शक्य असल्यास हथिनीकुंडचे पाणी मर्यादित वेगाने सोडावे, जेणेकरून दिल्लीतील यमुनेची पातळी आणखी वाढू नये.

'जगाला चांगला संदेश जाणार नाही'जी-20 शिखर परिषदेचा दाखला देत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि काही आठवड्यात येथे G20 शिखर परिषद होणार आहे. देशाच्या राजधानीत आलेल्या पुराच्या बातम्यांनी जगाला चांगला संदेश जाणार नाही. आपण सर्वांनी मिळून दिल्लीच्या जनतेला या परिस्थितीतून वाचवायचे आहे, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले.

दिल्लीतील या भागात पाणी तुंबलेकाश्मीर गेटच्या मोनस्ती मार्केट, रिंगरोड, यमुना घाट, यमुना बाजार परिसरात पुराचे पाणी पोहोचले आहे. आयटीओ येथील छठ घाट पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. यमुना नदीलगतचा परिसर अतिशय संवेदनशील आहे. या भागात सुमारे 41 हजार लोक राहतात. दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील 6 जिल्ह्यांमध्ये बाधित लोकांसाठी सुमारे 2700 तंबू बनवण्यात आले आहेत. या तंबूंमध्ये राहण्यासाठी आतापर्यंत 27 हजार लोकांनी नोंदणी केली आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीfloodपूरArvind Kejriwalअरविंद केजरीवालAmit Shahअमित शाहRainपाऊसriverनदी