शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

"आम्ही 100 mm पावसासाठी तयार होतो पण...", खासदार गौतम गंभीरचा 'आप'वर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 4:19 PM

राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे.

delhi floods 2023 : देशाची राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. सोमवारपासून यमुनेच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशा स्थितीत आज सकाळी हातिनीकुंड बॅरेजमधून १ लाख ५३ हजार ७६८ क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर यमुनेच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांवर मोठे संकट ओढावले आहे. स्थानिक लोक जीव वाचवण्यासाठी इतर भागात स्थलांतरित होत आहेत. अशातच माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीरने बुधवारी दुपारी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 

गौतम गंभीरने लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लवकरात लवकर मदत पोहचवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी भाजपा खासदाराने आम आदमी पार्टीवर निशाणा साधला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना गंभीरने म्हटले, "आम आदमी पार्टीने मागील ९ वर्षे केवळ आरोपांचे राजकारण केले आहे. त्यांनी दिल्लीतील पायाभूत सुविधांवर एक पैसाही खर्च केला नाही, फक्त सोयीचे राजकारण केले, घरे बांधण्याचे राजकारण केले, लोकांना मूर्ख बनवण्याचे राजकारण केले. आता ते बाहेर येत आहेत आणि सांगत आहेत की आम्ही 100MM पावसाची तयारी केली होती, पण तो 150MM झाला. 'आप'चे नेते फक्त त्यांचे फोटो काढण्यासाठी पाण्याच्या मध्यभागी जाऊन उभे राहतात. त्यांनी इथे येऊन लोकांची अवस्था पाहायला हवी."

पावसाचा हाहाकार  उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरयाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. राजस्थानच्या वाळवंटी राज्यापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत, गंगा, यमुना आणि बियाससह सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेकांच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. हजारो हेक्टरवरील पिकं नष्ट झाली आहेत. डोंगरावर पावसाचा कहर आहे. हिमाचलच्या कुल्लू पर्यटन स्थळांमध्ये मनाली, मणिकर्णा आणि बंजारमध्ये १७,००० पर्यटक अडकले आहेत. चार धाम यात्राही विस्कळीत झाली आहे.

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरdelhiदिल्लीBJPभाजपाAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालfloodपूर