शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

'एका निर्लज्ज, चारित्र्यहीन व्यक्तीपासून दिल्लीला मुक्ती मिळाली'; कुमार विश्वासांची केजरीवालांवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:18 IST

Kumar Vishwas Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. 

Kumar Vishwas Arvind Kejriwal News: अरविंद केजरीवालांसह पहिल्या फळीतील बड्या नेत्यांसह आम आदमी पक्षाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. आम आदमी पक्षाला २२ जागांपर्यंतच मजल मारता आली. तर दुसरीकडे भाजपने जोरदार मुसंडी मारत प्रचंड बहुमत मिळवले. या निकालानंतर अरविंद केजरीवालांवर त्यांचे एकेकाळचे सहकारी कुमार विश्वास यांनी सडकून टीका केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर एएनआयशी बोलताना कुमार विश्वार म्हणाले, "सर्वात आधी तर भाजपच्या लोकांना विजय मिळाला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आशा करतो की, जो जनादेश दिल्लीच्या जनतेने त्यांना दिला आहे, त्याची ते परिपूर्ति करतील." 

दिल्लीला मुक्ती मिळाली, केजरीवालांना म्हणाले, 'नीच माणूस'

कुमार विश्वास म्हणाले, "आम आदमी पक्षाचे ते सगळे लाखो-कोट्यवधी कार्यकर्ते, जे अण्णा आंदोलनातून पुढे आले. ज्यांचे खूप निर्मळ, निष्पाप आणि भारताच्या राजकारणाला बदलण्याच्या स्वप्नाची हत्या एका निर्लज्ज, नीच, मित्राला धोका देणाऱ्या चारित्र्यहीन व्यक्तीने केली.  त्याच्याप्रती काय संवेदना व्यक्त करायच्या. दिल्लीला त्याच्यापासून मुक्ती मिळाली", अशी टीका कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवालांवर केली.  

'सत्तेच्या लालसेपोटी थांबलेले दुसऱ्या पक्षात जातील'

"मला हे माहिती आहे की, आता आम आदमी पक्षात जे लोक राहिले होते, सत्तेच्या लालसेपोटी, पदांसाठी, पैशाच्या मोहापायी ते सगळे आता परत जातील. काही आपापल्या व्यवसायात परततील, काही इतर पक्षात जातील. आता त्या लोकांची सुरूवात झाली आहे", असेही कुमार विश्वास म्हणाले. 

"माझ्यासाठी आनंदाचा किंवा दुःख होण्याचा विषय नाहीये. मी मध्ये उभा आहे. आनंद या गोष्टीचा आहे की, कोट्यवधी लोक आशेला लागले होते, लोक व्यवसाय सोडून आले होते. शत्रूत्व पत्करलं होतं, त्या सगळ्यांची हत्या एका स्वतःच्या प्रेमात बुडालेल्या व्यक्तीने केली", अशी घणाघाती टीका कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवालांवर केली. 

अरविंद केजरीवालांचा पराभव

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचा दारूण पराभव झाला. भाजपचे उमेदवार प्रवेश साहिब वर्मा यांनी ३,१८१ इतक्या मताधिक्याने केजरीवालांचा पराभव केला. दिल्ली विधानसभा मतदारसंघातील या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष होते. कारण याच मतदारसंघातून काँग्रेसचे संदीप दीक्षित हेही मैदानात होते. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप