शहरं
Join us  
Trending Stories
1
"परम मित्र मोदी, तुम्हाला रशियात पाहून..."; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी गळाभेट घेत केलं खास स्वागत 
2
मुंबई मनपा हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, यंत्रणांना सुसज्ज राहण्याचेही निर्देश
3
पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश
4
नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय
5
पनवेल महापालिका हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे निर्णय
6
जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत १४ जुलैला भव्य सभा
7
Rahul Gandhi Manipur Visit: "इथे जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिले नाही", मणिपूरमध्ये राहुल गांधींनी घेतली हिंसाचार पीडितांची भेट!
8
'डोनाल्ड ट्रम्प यांचा मीच पराभव करणार', जो बायडेन यांचा उमेदवारी सोडण्यास नकार...
9
कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद, तर चार गंभीर जखमी
10
महागाईचा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर 
11
वाघ नखांबाबत इतिहासकारांचा खळबळजनक दावा; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका; म्हणाले...
12
"IPLच्या वेळी Hardik Pandya म्हणाला होता- लोकं शिव्या देतायत पण..."; Ishan Kishan ने सांगितली आठवण
13
मुलाच्या लग्नापूर्वी मुकेश अंबानी यांना लागला 14,91,862,00,000 रुपयांचा जॅकपॉट; पाहा...
14
मासिक पाळीत नोकरदार महिलांना सुट्टी? सर्वोच्च न्यायालयाला वाटतेय मोठी भीती, आम्ही आदेश दिला तर...
15
अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे बर्बाद झालं या अभिनेत्रींचं करिअर, कोणी देश सोडला, तर कुणी भोगला तुरूंगवास
16
Paris Diamond League : महाराष्ट्राचा 'लेक' काय धावला राव! अविनाशचा नवा रेकॉर्ड; शेतकरी पुत्राची गरूडझेप
17
अंगारकी विनायक चतुर्थीला अद्भूत योग: ‘या’ राशींना उत्तम, लाभच लाभ; गणपती बाप्पा शुभ करेल!
18
Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, मुलांच्या रुग्णालयासह ५ मोठ्या शहरांना लक्ष्य, २० लोकांचा मृत्यू
19
वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर; कर्णधार टेम्बा बवुमाची एन्ट्री
20
नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..."

फूटपाथवर राहणाऱ्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका; ९ दिवसांत उष्माघाताने १९२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 7:57 AM

उष्माघातामुळे लोकांचा आजारी पडून मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जे लोक बेघर आहेत किंवा फूटपाथवर रात्र घालवतात त्यांच्यासाठी हे अधिक कठीण आहे.

देशभरात कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत. दिल्लीची अवस्थाही वाईट आहे. येथील तापमान ४७ अंशांवर पोहोचले आहे. उष्माघातामुळे लोकांचा आजारी पडून मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जे लोक बेघर आहेत किंवा फूटपाथवर रात्र घालवतात त्यांच्यासाठी हे अधिक कठीण आहे. एका रिपोर्टनुसार, ११ ते १९ जून २०२४ दरम्यान दिल्लीत उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे १९२ बेघर लोकांचा मृत्यू झाला आहे.

उष्माघातामुळे बेघर लोकांच्या समस्या वाढत आहेत. त्यांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळत नाही. उदाहरणार्थ, आरोग्य सुविधा, उष्णता टाळण्यासाठी पंखे. यामुळे बेघर लोकांना उष्णतेशी संबंधित आरोग्य समस्या जसं की थकवा, उष्माघात आणि डिहायड्रेशनचा सामना करावा लागतो. त्यांना आश्रय देण्यासाठी बांधलेले शेल्टर अनेकदा क्षमता आणि सुविधांच्या बाबतीत कमी पडतात. त्यामुळे हवामानातील बदलांचा त्यांच्यावर सर्वाधिक परिणाम होतो. 

सेंटर फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट (CHD) नावाच्या एनजीओचे कार्यकारी संचालक सुनील कुमार अलेदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दिल्लीमध्ये ११ ते १९ जून २०२४ दरम्यान उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे १९२ बेघर लोकांचा मृत्यू झाला आहे.' गेल्या वर्षी ११ जून ते १९ जून या कालावधीच्या तुलनेत २०२४ मधील मृत्यूंची संख्या खूप जास्त आहे. मृतदेहांपैकी ८० टक्के मृतदेह बेघर लोकांचे आहेत.

वर्ष     मृत्यू
२०१९१४३
२०२०१२४
२०२१५८
२०२२१५०
२०२३७५
२०२४१९२

तापमान वाढण्याचे कारण काय?

वायू प्रदूषण, जलद औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे वाढत्या तापमानामुळे बेघर लोकांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी शुद्ध पिण्याचं पाणी मिळणं हे देखील एक मोठं आव्हान आहे, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि त्यासंबंधीचे इतर आजार होत आहेत.

याशिवाय उष्णतेमुळे जुनाट आजार आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या ऋतूत जुनाट आजार वाढतात. पैशांच्या कमतरतेमुळे, बरेच बेघर लोक सनस्क्रीन, टोपी किंवा हलके कपडे खरेदी करू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना थेट सूर्यप्रकाशापासून हानी पोहोचते.

भीषण परिस्थिती असूनही, बेघर लोकांना दीनदयाल राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM-SUH) आणि प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सारख्या सरकारी कल्याणकारी कार्यक्रमांचा लाभ मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे ना ओळखपत्र आहे ना कायमचा पत्ता. सुनील कुमार अलेदिया म्हणाले की, अशा लोकांना फूटपाथवर दिवस काढण्याशिवाय पर्याय नाही. या गंभीर परिस्थितीत कुलिंग सेंटर, शेल्टर होमची व्यवस्था करणे, पाणी आणि घरं उपलब्ध करून देणं यासारख्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्यावं लागेल.

टॅग्स :delhiदिल्लीTemperatureतापमान