शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

दिल्ली महापौर निवडणुकीत मोठा गोंधळ; AAP आणि BJP नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 16:01 IST

आज राजधानी दिल्लीत महापौरपदाची निवडणूक होणार होती, पण नगरसेवकांच्या गोंधळानंतर पुढे ढकलण्यात आली आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतमहापौरपदाच्या निवडणुकीत मोठा गोंधळ झाला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची आणि हाणामारी झाली. यादरम्यान, अनेक नगरसेवकांनी खुर्च्या उचलून एकमेकांवर फेकण्यास सुरुवात केली. तर काहींनी टेबलावर चढून पीठासीन अधिकाऱ्यांसमोर घोषणाबाजीही केली. गदारोळानंतर महापालिकेचे कामकाज पुढे ढकलण्यात आले. यानंतर दोन्ही पक्षांतून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत.

आपचा या गोष्टीला विरोधआज दिल्लीच्या महापौरांची निवड होणार होती, मात्र त्यापूर्वी पीठासीन अधिकाऱ्याची निवड झाली आणि त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्याने प्रथम नामनिर्देशित नगरसेवकांना शपथ घेण्यासाठी बोलावले. यावरून आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी गदारोळ सुरू केला. पीठासीन अधिकाऱ्याने नामनिर्देशित नगरसेवकांना बोलावताच आप नेते मुकेश गोयल यांनी उभे राहून विरोध केला आणि गेल्या 15 वर्षांपासून हे होत आहे, आता ते बदलावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ सुरू केला.

आपचा भाजपवर आरोपघंटानाद झाल्यानंतर आप नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या टेबलासमोर घोषणाबाजी केली. दरम्यान, दिल्लीतील महापौरपदाच्या निवडणुकीत विजय-पराजय अत्यंत कमी फरकाने होणार, त्यासाठी दोन्ही पक्ष जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. 10 नामनिर्देशित नगरसेवकांना मतदानाचा अधिकार देण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप 'आप'कडून करण्यात येत आहे.

भाजपचा आपवर गंभीर आरोपमहापालिकेच्या कामकाजात गदारोळ झाल्यानंतर भाजपचे खासदार प्रवेश वर्मा म्हणाले की, आमच्या महिला नगरसेवकांशी गैरवर्तन करण्यात आले. दारुच्या नशेत आलेल्या नगरसेवकांनी धारदार वस्तू, काचेच्या तुकड्याने जखमी केले आणि केसही ओढले. यासोबतच भाजपच्या महिला नगरसेवकाने आपल्याला शिवीगाळ करुन शपथ घेण्यापासून रोखल्याचा आरोप केला आहे. एमसीडीच्या इतिहासात यापेक्षा काळा दिवस असू शकत नाही.

काँग्रेसने निवडणुकीत भाग घेतला नाहीकाँग्रेसने महापौरपदाच्या निवडणुकीत भाग घेतला नाही. याबाबत आम आदमी पक्षाकडून भाजप आणि काँग्रेसमध्ये करार झाला आहे, त्यामुळे काँग्रेसने निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला. आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले की, काँग्रेस-भाजपमधील डील उघड झाली आहे. काँग्रेसने घराबाहेर राहिल्यास महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपसाठी चांगलेच होईल आणि काँग्रेसनेही त्यास सहमती दर्शवली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्यासाठी भाजपने एमसीडीमधील काँग्रेसचे नेते नाझीश दानिश यांना हज समितीचे सदस्य बनवले असल्याचा आरोप आप नेत्याने केला आहे.

टॅग्स :delhiदिल्लीElectionनिवडणूकMayorमहापौरAAPआपBJPभाजपा