शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:52 IST

Kailash Gahlot quits AAP : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत कैलाश गेहलोत यांनी हे पाऊल उचलले. 

Kailash Gahlot quits AAP : नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पार्टीला (आप) मोठा धक्का बसला आहे. दिल्ली सरकारचे ज्येष्ठ मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, त्यांनी आपला सुद्धा रामराम ठोकला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत कैलाश गेहलोत यांनी हे पाऊल उचलले. 

दिल्लीच्या आतिशी सरकारमध्ये ते परिवहन मंत्री म्हणून कार्यरत होते. कैलाश गेहलोत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  एक्सच्या माध्यमातून लोकांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये राजधानीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत कैलाश गेहलोत यांचा राजीनामा आपला मोठा धक्का समजला जात आहे.

आतिशी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री बनवताना कैलाश गेहलोत यांचेही नाव या पदासाठी पुढे येत होते. मात्र, या मोठ्या जबाबदारीसाठी अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांची निवड केली. जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी दिल्लीच्या उपराज्यपालांनी कैलाश गेहलोत यांची निवड केली होती. 

दरम्यान, आतिशी सरकारमधील मंत्री कैलाश गेहलोत यांनीही सोशल मीडियावर शेअर केलेल्या पत्रात आपच्या अंतर्गत समस्यांचा उल्लेख केला आहे. तसेच, यावर मात करण्याची गरज असल्याचे कैलाश गेहलोत म्हणाले. तसेच, अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावरून झालेल्या विवादाचा संदर्भ देताना त्यांनी शीशमहल असा शब्दाचा वापर केला आहे.

वचनबद्धता पूर्ण करण्यात अपयशी - कैलाश गेहलोत याचबरोबर, अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात कैलाश गेहलोत यांनी दिल्लीतील जनतेला दिलेली मुख्य आश्वासने पूर्ण करण्यात पक्ष अपयशी ठरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यमुना नदी स्वच्छ करण्यात आलेले अपयश कैलाश गेहलोत यांनी अधोरेखित केले. आम्ही जनतेला स्वच्छ यमुनेचे आश्वासन दिले होते, पण ती वचनबद्धता पूर्ण करण्यात आम्ही अपयशी ठरलो असल्याचे कैलाश गेहलोत यांनी सांगितले आहे. तसेच, कैलाश गेहलोत पुढे म्हणाले की, दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमधील सततचा संघर्ष शहराच्या विकासात अडथळा ठरत आहे. दिल्ली सरकारने आपला बराचसा वेळ केंद्र सरकारसोबत लढण्यात घालवला तर दिल्लीची खरी प्रगती शक्य नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालAtishiआतिशी