शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

'मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे जनरल डायर बनलेत', आप नेत्याचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 13:12 IST

Aam Aadmi Party leader Raghav Chadha : आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्डा यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची तुलना जनरल डायर यांच्याशी केली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलन शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे.शेतकऱ्यांच्या मागणीवर आज तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणामधीलशेतकरी दिल्लीच्या सीमेवर बऱ्याच दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनदरम्यान पाऊस आणि कडाक्याच्या थंडीतही शेतकरी रस्त्यावर आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्डा यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची तुलना जनरल डायर यांच्याशी केली आहे.

वृत्तसंस्था एएनआयशी राघव चड्डा यांनी बातचीत केली. यावेळी मनोहर लाल खट्टर यांनी जनरल डायर यांच्यासारखे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्याचे आणि गोळीबार करण्याचे आदेश दिले आहेत, असे राघव चड्डा म्हणाले. तसेच, देशातील शेतकरी आपले शत्रू आहेत का? ते चीन किंवा पाकिस्तान लष्कराचे जवान आहेत का? त्याच्याशी असे का वागले जात आहे? असे सवाल राघव चड्डा यांनी केले आहेत.

नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हळूहळू तीव्र होत आहे. रविवारी शेतकऱ्यांनी पोलिसांचे बॅरिकेडिंग तोडून दिल्लीच्या दिशेने पुढे आले. त्यानंतर दिल्ली-जयपूर महामार्गावरील मसानी गावाजवळ पोलीस आणि शेतकर्‍यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी पुढे जाण्यावर ठाम होते. त्याचवेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून अश्रुधुराचा वापर केला.

दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलन शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीवर आज तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, आजच्या बैठकीतून तोडगा निघेल आणि तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन लवकरच संपेल, अशी आशा केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत बैठकीच्या सहा फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तीन कृषी कायद्यांबाबत सरकार व शेतकरी यांच्यात सुरू असलेली चर्चा अद्याप संपलेली नाही. सप्टेंबरमध्ये संसदेने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटना ठाम आहेत. सरकारचे म्हणणे आहे की या कायद्यांमुळे कृषी क्षेत्र सुधारेल आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल. नवीन कृषी कायद्यांमुळे एमएसपी आणि मंडई व्यवस्था कमकुवत होईल, अशी भीती शेतकरी संघटनांना वाटत आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीAAPआपHaryanaहरयाणा