शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

'आंदोलकांवर दिल्ली पोलिसांचा गोळीबार, भाजपाचं गलिच्छ राजकारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 15:01 IST

दक्षिण दिल्लीतील एका आंदोलनावेळी तेथील बस गाड्यांना आग लावण्यात पोलिसांनीच पुढाकार घेतला होता

नवी दिल्ली - देशात नागरिक सुधारणा विधेयकावरुन रणकंदन माजलं आहे. नॉर्थ इस्ट राज्यांमध्ये नागरिक आक्रम झाले असून हिंसात्मक घटना घडत आहेत. नागरिक सुधारणा विधेयकाला विरोध करत विद्यार्थ्यांसह, तेथील नागरिकांनी मोठं आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाची धग देशभर जाणवत असून दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायलं मिळत आहे. दिल्लीतील आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार आणि गोळीबार करण्यात आला आहे. त्यावरुन, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. 

दक्षिण दिल्लीतील एका आंदोलनावेळी तेथील बस गाड्यांना आग लावण्यात पोलिसांनीच पुढाकार घेतला होता, असा आरोप सिसोदिया यांनी केला आहे. सिसोदिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिल्ली पोलिस बसला आग लावताना दिसत आहेत. तसेच, व्हिडिओमध्ये पोलिसांकडून गोळीबार करण्यात येत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे विनाकारण गाड्यांची तोडफोड पोलिसांकडून होत आहे. भाजपाकडून गलिच्छ राजकारण होत असून दिल्लीत भडकलेल्या हिंसेचा नि:पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणीही सिसोदिया यांनी केलीय.   

लखनौमधील नदवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनीही विधयेकास विरोध करत मोदी सरकारचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे, पोलिसांनी कॉलेजचे गेटच बाहेरुन बंद केलंय. जामिया येथील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात येत आहे. तसेच, हैदराबादमधील मौलाना आझाद नॅशनल उर्दु युनिव्हर्सिटी येथेही विद्यार्थ्यांनी जामिया येथील विद्यार्थ्यांना समर्थन देत आंदोलन सुरू केलं आहे.  जामिया विश्वविद्यालयाजवळ हिंसात्मक घटन घडल्या आहेत. या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत, पण दिल्लीमध्ये याची सर्वाधिक धग जाणवत आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याऐवजी हिंसा भडकवण्याचं काम केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी केला आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाAmit Shahअमित शहा