शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

"दिल्ली हिंसाचारामुळे देशाची प्रतिमा खराब, गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 17:24 IST

Delhi violence: 'दिल्ली हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून न्यायालयीन चौकशी व्हावी'

ठळक मुद्देदिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. 'दिल्ली हिंसाचारप्रकरणी 600 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.''आमचा एसआयटीवर विश्वास नाही. याची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे'

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारामुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांच्या कामकाजावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि आम आदमी पार्टी (आप) व्होट बँकेचे राजकारण करत आहे, असा आरोप करत काँग्रेसने दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्याव्या, अशी मागणी केली आहे. 

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिल्ली हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी आमची मागणी केली. याशिवाय, हिंसाचारातील प्रत्येक पीडित कुटुंबाला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. तसेच, हिंसाचारादरम्यान ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी काहीच केले नाही, त्यांच्यावर आणि भडकाऊ भाषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे मुकुल वासनिक यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, काँग्रेसची मागणी मागणी आहे की, दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले गृहमंत्री (अमित शहा) यांनी राजीनामा द्यावा. दिल्लीत निर्माण झालेल्या परिस्थितीला रोखण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही, असे आम्हाला वाटते. दिल्ली निवडणुकीच्यावेळी त्यांनी एक भाषण केले होते, त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, 'हा करंट शाहीन बागेत पोहोचला पाहिजे.' तसेच, दिल्ली हिंसाचारप्रकरणी 600 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांच्यावर कोणताही कारवाई झाली नाही, असेही मुकुल वासनिक यांनी सांगितले. 

मुकुल वासनिक म्हणाले, "आमची मागणी आहे की वेळ न घालवता या नेत्यांवर सुद्धा एफआयआर दाखल झाला पाहिजे, आमचा एसआयटीवर विश्वास नाही. याची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. तसेच, ज्या पोलिसांनी योग्यरित्या काम केले नाही, अशा पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे." 

टॅग्स :Mukul Wasnikमुकूल वासनिकcongressकाँग्रेसdelhi violenceदिल्लीAmit Shahअमित शहा