शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

मागणी, निर्यातच कंपन्यांना वाचविणार

By admin | Published: January 19, 2017 4:49 AM

देशांतर्गत धोरणांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेवर मात करू शकतात, असा निष्कर्ष एस अँड पी या जागतिक मानक संस्थेने जारी केला

नवी दिल्ली : मजबूत देशांतर्गत मागणी अणि निर्यातीतील स्पर्धात्मक किमती याबळावरच भारतीय कंपन्या जागतिक तसेच देशांतर्गत धोरणांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेवर मात करू शकतात, असा निष्कर्ष एस अँड पी या जागतिक मानक संस्थेने जारी केला आहे.एस अँड पीने ‘इंडिया कॉर्पोरेट आऊटलूक २0१७’ या नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. संस्थेने म्हटले की, वेगवान आर्थिक वृद्धी आणि सुधारणा यांनी भारताला सूक्ष्म आर्थिक क्षेत्रात भक्कम स्थान मिळवून दिले आहे. याशिवाय कंपन्यांचा स्थिर के्रडिट फोईलही उपकारकच आहे. मजबूत आर्थिक वृद्धी आणि घसरणारे व्याजदर याबाबीही कंपन्यांना लाभदायक आहेत.एस अँड पीचे विश्लेषक अभिषेक डांगरा यांनी म्हटले की, जागतिक कंपन्यांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांचे स्थान मजबूत आहे. भारतीय कंपन्यांची भांडवली खर्चाचे व्यवस्थापन आणि देशातील धोरणात्मक सुधारणा यांच्याशी जुळवून घेण्याची क्षमता चांगली आहे. या क्षमतेवर आम्हाला विश्वास आहे. डांगरा म्हणाले की, नोटाबंदीमुळे देशातील मागणीत मोठी घसरण झाली आहे. ही कंपन्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. कंपन्यांसाठी चालू आर्थिक वर्षाच्या महसुली वृद्धीत ही मोठी जोखीम आहे. २0१८ मध्ये वस्तू व सेवा करामुळे अशीच जोखीम निर्माण होऊ शकते.