शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'लोकशाहीमध्ये जनता हीच मालक; कॉँग्रेस केवळ जनतेचा आवाज ऐकण्यासाठी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 03:18 IST

लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते, असे कॉँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी ठासून सांगितले. कोणते काम केले पाहिजे, ते आमच्या पक्षाच्या सरकारला सांगा, ते केले जाईल,

सिमडेगा : लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते, असे कॉँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी ठासून सांगितले. कोणते काम केले पाहिजे, ते आमच्या पक्षाच्या सरकारला सांगा, ते केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. प्रचार सभेत ते म्हणाले की, लोकशाहीत तुम्हीच मालक आहात, याचा विसर पडू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अन्य कोणी नेता तुमचा मालक नाही. काय केले पाहिजे ते फक्त तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही ते करू. कॉँग्रेस ज्या महाआघाडीचा भागीदार आहे, ती जनतेचा आवाज ऐकण्यासाठी आहे. नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमावर टीका करून, आपण येथे मन की बात ऐकविण्यासाठी नव्हे, तर तुमचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी आलो आहोत, असेही ते म्हणाले.

कृषी क्षेत्र संकटात असताना मोदी यांनी शेतकऱ्यांना कर्जे मिळू दिली नाहीत. मोदी सरकारने जवळच्या १५ ते २० उद्योगपतींना मात्र फायदा करून दिला, या आरोपाचा गांधी यांनी पुनरुच्चार केला. आदिवासींची जमीन हिरावून घेतली जाऊ नये, यासाठी आमचा पक्ष वचनबद्ध असल्याचे सांगून, जीएसटीची अंमलबजावणी हलगर्जीपणे केल्याबद्दल त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. कॉँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर दरमहा १२ हजार रुपयांपेक्षा ज्या कुटुंबांचे उत्पन्न कमी आहे, अशांच्या बँक खात्यात दरवर्षी ७२ हजार रुपये जमा केले जातील. देशातील पाच कोटी कुटुंबांना या न्याय रोजनेचा लाभ मिळेल. कॉँग्रेस गरिबांवर रुग्णालयांमध्ये नि:शुल्क उपचार करण्याची योजना आणेल, असे सांगून गांधी म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर कुशल कर्मचारी बळ निर्माण करता यावे यासाठी जिल्ह्यांमध्ये तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था उघडण्यात येतील.

मुंडा विरुद्ध मुंडायेथील खुंटी मतदारसंघातून काँग्रेसचे कालिचरण मुंडा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री अर्जुनमुंडा यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी