शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'मुस्लिमांनी बांधलेले ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनारही पाडा...', खरगेंची BJP वर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 18:27 IST

आज दिल्लीतील कार्यक्रमात मल्लिकार्जु खरगे यांनी संभल मशीद प्रकरण आणि वक्फ बोर्ड प्रकरणासह विविध मुद्द्यांवरुन भाजपवर जोरदार टीका केली.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वात आज राजधानी दिल्लीत संविधान बचाव कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जु खरगे यांनी संभल मशीद प्रकरण आणि वक्फ बोर्ड प्रकरणासह विविध मुद्द्यांवरुन भाजपवर जोरदार टीका केली. 'हे लोक मशिदीखाली मंदिर असल्याचे सांगत आहेत. पण, मोहन भागवत 2022 मध्ये म्हणाले होते की, प्रत्येक मशिदीखाली शिवालय शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्या लोकांचे म्हणनेच ऐकत नाही.'

ताजमहाल-लाल किल्लाही पाडा'1947 पूर्वीच्या धार्मिक स्थळांची स्थिती कायम ठेवण्यासाठी 1991 मध्ये कायदा करण्यात आला होता, मात्र त्याचेही पालन होत नाही. त्यामुळे मोहन भागवतांचे विधान केवळ दिखाव्यासाठी आहे, असे मला वाटते. भाजपवाल्यांनी आता लाल किल्ला, कुतुबमिनार, ताजमहाल अन् हैदराबादचे चार मिनारही पाडा. हे सर्व मुस्लिमांनी बांधले आहे. मी स्वतः हिंदू आहे. माझे नाव मल्लिकार्जुन आहे. माझे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पण, मी सेक्युलर हिंदू आहे. तुम्ही सेक्लुयर हिंदूंना मानत नाही. वक्फ विधेयकालाही आमचा विरोध आहे. कुठेतरी चूक झाली असेल तर ती सुधारता येते, पण तोडफोड देशाला विनाशाकडे घेऊन जाईल,' असेही खरगे यावेळी म्हणाले.

खरगेंची x पोस्टमल्लिकार्जु खरगेंनी आजच्या कार्यक्रमानंतर एक्स पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले, 'आज ऐतिहासिक रामलीला मैदानावर संविधान वाचवण्यासाठी, आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आणि जात जनगणनेसाठी काढण्यात आलेल्या रॅलीसाठी देशभरातून आलेल्या तुमच्या सर्व मित्रांचे मी अभिनंदन करतो. मी दलित, ओबीसी, अल्पसंख्याक आणि आदिवासी संघटनांच्या महासंघाचेही अभिनंदन करतो, ज्यांच्या झेंड्याखाली एक छोटासा भारत येथे एकत्र आला आहे. ही रॅली विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे.'

'गेल्या 11 वर्षात भाजपने सातत्याने संविधान, घटनात्मक संस्था आणि लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. माध्यमांवर बंधने आली, पत्रकारांना तुरुंगात टाकले. संविधान बदलण्यासाठी भाजप नेत्यांनी उघडपणे 400 जागांची मागणी करण्यास सुरुवात केली. अशा वातावरणात राहुल गांधींनी काश्मीर ते कन्याकुमारी आणि नंतर मणिपूर ते मुंबई असा प्रवास केला. या यात्रांनी काँग्रेस पक्षाचे आणि जनतेचे मुद्दे मांडले. तुम्ही सगळे इथे या ऐतिहासिक रामलीला मैदानात जमले आहात, कारण हे मुद्दे आजही संपलेले नाहीत. देशातील तरुण, कामगार, दुर्बल घटक, अल्पसंख्याक आणि शेतकऱ्यांच्या समस्या असलेल्या अशा मुद्द्यांवर तुम्ही सर्वजण लढत आहात याचा मला आनंद आहे.'

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा