शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

एकाच वेळी चार ठिकाणी ढगफुटीने कहर; हिमाचल प्रदेशात घरे, पूल आणि रस्ते गेले वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 05:25 IST

कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे.

शिमला:हिमाचल प्रदेशात ढगफुटीच्या अनेक घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ५० जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसामुळे अनेक घरे, पूल आणि रस्ते वाहून गेल्याचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, कुल्लूमधील निर्मंद, सेंज, मलाना, मंडीतील पदर आणि शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे ढगफुटी झाली. समेज खुड (नाला) मध्ये ढगफुटीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आणि इतर २८ जण बेपत्ता आहेत. घटनास्थळावरून दोन जणांची सुटका करण्यात आली आहे.

कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे, मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे.

राज्यात बुधवारपासून मुसळधार

हिमाचल प्रदेशातील अनेक भागांत बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात सर्वाधिक २१२ मिमी पावसाची नोंद पालमपूरमध्ये झाली. यानंतर चौरीमध्ये २०३, धर्मशालामध्ये १८३.२ मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

अमित शाह यांनी घेतला आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्याशी बोलून राज्यातील ढगफुटीमुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला. केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशातील ढगफुटीमुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल दु:ख व्यक्त केले.

देशात कुठे काय झाले?

-दिल्लीत मुसळधार पाऊस, विविध दुर्घटनांत तीन ठार-पंजाब-हरयाणात जोरदार पाऊस, प. बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा.-बिहारच्या जेहानाबाद आणि रोहतास जिल्ह्यात वीज पडून ५ जणांचा मृत्यू.-पावसाळ्यात मध्य प्रदेशातील ३ जिल्ह्यांमध्ये अतिसारामुळे १७ जणांचा मृत्यू.-गुरुग्रामममध्ये मुसळधार पावसामुळे मेट्रो रेल्वेस्थानकाजवळ तिघांना विजेचा धक्का बसला.-पाकिस्तानच्या लाहोरमध्ये धुँवाधार पाऊस, एक ठार , ४४ वर्षांतील सर्वाधिक पाऊस येथे झाला आहे.-जयपूरमधील घराच्या तळघरात पावसाचे पाणी घुसून पती-पत्नी, भाची बुडाली.-उत्तराखंडमध्ये ७ जणांचा मृत्यू.

 

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊसHimachal Pradeshहिमाचल प्रदेशdelhiदिल्लीHaryanaहरयाणाBiharबिहारRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेश