शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
2
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
3
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
4
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
5
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
6
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
7
Sanju Samson बन गया 'सेंच्युरी' मॅन! षटकार-चौकारांची केली 'बरसात'
8
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
9
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
10
त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव  
11
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
12
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
13
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
14
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
15
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
16
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
17
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
18
Chris Gayle, LLC 2024 Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
19
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
20
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन

फडणवीसांचा फोन वाजला, पलीकडे उद्धव होते, म्हणाले...; ' 'तो' संवादही भूकंप घडवणारा होता!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 3:03 PM

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेनेवर अस्थिरतेचे संकट आले

मुंबई - राज्यातील किंबहुना देशातील सर्वात मोठ्या राजकीय बंडामुळे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या सत्तांतरानंतरही या सत्तास्थापनेच्या चर्चा आणि सत्तास्थापनेच्या अलीकले-पलीकडे नेमकं काय घडंलं हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यातच, शिंदेगट आणि शिवसेना एकत्र येतील का, हाही प्रश्न नव्याने समोर आला आहे. तर, आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडवीसांना फोन केला होता, अशी माहिती समोर आली आहे 

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेनेवर अस्थिरतेचे संकट आले. सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीभाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना एकदा नाहीतर दोनदा फोन केल्याचे वृत्तही तेव्हा माध्यमांत झळकले होते. मात्र, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळले. आता, या फोनकॉलचं नेमकं काय झालं याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंचा हा फोन सरकार वाचविण्यासाठी नसून शिवसेना वाचविण्यासाठी होता, असेच या दोन्ही नेत्यांमधील संभाषणातून दिसून येईल. 

उद्ध ठाकरेंनी शिवसेनेच्या तत्कालीन एका मंत्र्याद्वारे देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता. फोनवरुन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट एकनाथ शिंदेंना बाजुला करा आणि आमच्याशी चर्चा करा, असे आवाहन केले. एकनाथ शिदेंची बारगेनिंग पॉवर का वाढवत आहात, थेट आमच्याशी बोला. आपण भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन करू, असा प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोनकॉलद्वारे दिला होता. मात्र, आता वेळ निघून गेलेली आहे, आपण एकनाथ शिंदेंच्या विश्वासाला फसवू शकत नाही. त्यामुळे, तुम्ही थेट अमित शहांसोबत बोला, असे उत्तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिले होते. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्याशी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमित शहांकडून फोन घेण्यात आला नाही. कारण, 2019 च्या सत्तास्थापनेवेळी अमित शहांनी मातोश्रीवर फोन केला होता. पण, उद्धव ठाकरेंनी तो कॉल घेतला नव्हता, असे वृत्त मुंबई तकने दिले आहे. दरम्यान, या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही फोन केला होता. मात्र, मोदी हे कुठल्यातरी कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी अमित शहांसोबत चर्चा करण्याचे उद्धव ठाकरेंना सूचवले होते. मात्र, शहा यांच्याकडून उद्धव ठाकरेंना बोलण्यास टाळटाळ करण्यात आली. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनीही भाजपसोबत चर्चा करण्याची आशाच सोडून दिली होती. 

बंडाच्या दुसऱ्याच दिवशी फडणवीसांना फोन

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. एवढच नाहीतर मिलिंद नार्वेकर यांनाही सुरतमध्ये पाठवले होते. पण, एकनाथ शिंदेंनी काही ऐकलं नाही. शिंदेंनी फक्त महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीमुळे या बंडामागे भाजप असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची बातमी झळकली होती. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना