शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Dhirendra Shastri : साईबाबांवरील विधान भोवले! बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी अखेर मागितली माफी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 20:57 IST

Dhirendra Shastri : धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफी मागितली आहे. बागेश्वर धामच्या ट्विटर अकाउंटवर बाबांनी याबाबत ट्विट केलं आहे. 

बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri) गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यानंतर बागेश्वर बागेश्वर बाबा यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा यांनाच देव मानण्यास नकार दिला. साई बाबा यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला. यानंतर आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफी मागितली आहे. बागेश्वर धामच्या ट्विटर अकाउंटवर बाबांनी याबाबत ट्विट केलं आहे. 

"संत आणि महापुरुषांबद्दल मला नेहमीच आदर राहिला आहे. आपल्या मागे छत्री ठेवून आपण शंकराचार्य आहोत असे म्हटले तर कसे होईल? आमच्या शंकराचार्यांनी जे म्हटलं त्याच गोष्टीचा आम्ही पुनरुच्चार केला की साईबाबा संत, फकीर असू शकतात. त्यांच्याप्रती लोकांची आस्था आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. कोणी संत गुरुंना देव मानत असेल तर ती त्याची वैयक्तिक आस्था आणि भावना आहे. आमचा त्याला अजिबात विरोध नाही. आमच्या कोणत्या शब्दाने कुणाचं मन दुखावलं असेल तर त्याचे आम्हाला मनापासून दुःख होत असून खेद वाटत आहे" असं बागेश्वर बाबा यांनी म्हटलं आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांवर केलेल्या विधानाप्रकरणी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांत लेखी तक्रार दाखल करण्यात आली. ही तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेने केली. 

बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविरोधात केलेले वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात ही तक्रार दिली. बागेश्वर बाबांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. बागेश्वर बाबा हे शिर्डी साईबाबांच्या भक्तांच्या भावनांशी खेळत असल्याचे युवासेनेने तक्रारीत म्हटले आहे. 

युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल यांनी तक्रारीत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तत्पूर्वी, साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठे स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचे स्थान दिलेले नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकत नाही, असे विधान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले होते. 

दरम्यान, ज्यांची साईबाबांवर श्रद्धा आहे, त्यांच्या श्रद्धेला मी दुखावू इच्छित नाही. कोणतेही संत असू द्या, मग गोस्वामी तुलसीदास असो, सूरदास असो हे सर्व संत आहेत. काही महापुरुष आहेत. काही युगपुरुष आहेत. काही कल्प पुरुष आहेत. परंतु यात कोणीही देव नाही, असेही बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धाम