शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

"बाबासाहेबांच्या संविधानाने वाचवले", तुरुंगाबाहेर येताच मनीष सिसोदियांची पहिली प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 19:54 IST

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया 17 महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर आले.

Manish Sisodia out of Jail : दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी गेल्या 17 महिन्यांपासून तिहार तुरुंगात कैद असलेले आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना आज अखेर जामीन मिळाला. जामिनाची प्रत मिळाल्यानंतर तिहार प्रशासनाने सायंकाळी त्यांची सुटका केली. यावेळी तुरुंगाबाहेर आपच्या मंत्र्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी सिसोदिया यांचे जंगी स्वागत केले. दरम्यान, बाहेर येताच सिसोदियांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

अरविंद केजरीवाल बाहेर येणार...तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी 'इन्कलाब जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, "हुकूमशाहीने मला तुरुंगात टाकले होते, पण बाबासाहेबांच्या संविधानाने बाहेर काढले. कोणत्याही हुकूमशाही सरकारने संविधानाचा दुरुपयोग करू नये, असे बाबासाहेबांचे स्वप्न होते. आता याच संविधानाच्या ताकदीने अरविंद केजरीवालही बाहेर येतील. गेल्या 17 महिन्यांपासून फक्त मीच तुरुंगात नव्हतो, तर दिल्लीतील प्रत्येक व्यक्ती, दिल्लीतील शाळेचा प्रत्युक विद्यार्धी माझ्यासोबत होता. मी सर्वोच्च न्यायालयाचेही मनापासून आभार मानतो," अशी प्रतिक्रिया सिसोदिया यांनी दिली.

आपचा भाजपवर घणाघातआज सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार संजय सिंह म्हणाले की, सिसोदिया यांचा जामीन म्हणजे हुकूमशाही, हिटलरशाही आणि मोदी सरकारला मारलेली चपराक आहे. ईडी आणि सीबीआयला सिसोदिया यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. तपास यंत्रणेने छापेमारी केली, मात्र कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. ज्यांनी शिक्षणात क्रांती केली, त्यांना तुरुंगात टाकले. आरोग्य क्षेत्रात क्रांती करणाऱ्या सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकले. मी प्रश्न विचारल्यावर मलाही तुरुंगात टाकले. सरकारचा हेतू तपासाचा नसून विरोधकांचा आवाज दाबण्याचा आहे. तुमच्याकडे कोणताही पुरावा नाही. सरकारने किमान आता तरी हे राजकारण थांबवावे. 

 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालManish Sisodiaमनीष सिसोदिया