शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

भाजपने अशाच पद्धतीने महाराष्ट्र, हरयाणा निवडणूक जिंकली का?, केजरीवालांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 11:12 IST

अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. मतदार यांद्यासंदर्भात केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. 

Arvind Kejriwal Delhi Assembly Election 2025: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. दिल्लीतील मतदारांची नावे वगळ्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपच्या लोकांना रंगेहाथ पकडले असल्याचे केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांनी हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक होण्याचा अंदाज आहे. सत्ताधारी असलेल्या आम आदमी पार्टीने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाकडून काही उमेदवारही जाहीर करण्यात आले असून, अरविंद केजरीवाल दिल्लीतील मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. 

मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न, मोठा गौप्यस्फोट करणार -अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत भाजपच्या लोकांकडून मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज दाखल केले जात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. 

"दिल्लीत भाजप मोठ्या प्रमाणात लोकांची मते कापण्याचा प्रयत्न करत असताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. भाजपने हजारो मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. यावर लवकरच मोठा खुलासा करेन", असे केजरीवाल म्हणाले. 

"हे लोक हरयाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकाही अशाच पद्धतीने जिंकले आहेत का? भाजपवाल्यानो, दिल्लीत तुमचं षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही", असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. 

महाराष्ट्रातही चर्चिला गेला मतदारांची नावे वगळण्याचा मुद्दा 

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने मतदारांची नावे परस्पर वगळण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. 

महाविकास आघाडीचे जे मतदार आहेत, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला होता. तोच मुद्दा आता दिल्लीत अरविंद केजरीवालांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीBJPभाजपाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी