शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

मी नरेंद्र मोदींची जाहीर स्तुती करतो म्हणून व्हिसा नाकारला का? - अनुपम खेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2016 5:51 PM

मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उघडपणे स्तुती करतो म्हणून मला पाकिस्ताननं व्हिसा नाकारला का?

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उघडपणे स्तुती करतो म्हणून मला पाकिस्ताननं व्हिसा नाकारला का? मी काश्मिरी पंडीत आहे, आणि पाकिस्तानला अडचणीचं ठरेल असं काही बोलेन म्हणून व्हिसा नाकारला का? असे प्रश्न माझ्या मनात येतात असं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.
पाकिस्ताननं अनुपम खेर यांनी व्हिसासाठी अर्जच केला नव्हता अशा प्रकारचं स्पष्टीकरण पाकिस्तानी कौन्सुलेटनं दिलं असेल तर ते खोटं असल्याचं खेर म्हणाले. मी पाकिस्तानमध्ये मी लिहिलेल्या पुस्तकाची चर्चा करणार होतो आणि त्यासाठी कराची लिट फेस्टिवलच्या आयोजकांनी मला बोलावलं होतं असं खेर म्हणाले. व्हिसासाठी मी नाही तर कराची लिट फेस्टिवलच्या आयोजकांनी माझ्यासाठी अर्ज केला होता असं सांगताना १८ जणांपैकी केवळ मलाच व्हिसा मिळाला नाही, याचा अर्थ काय होतं असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
मी सहिष्णूता, असहिष्णूता यावर बोलणार नव्हतो किंवा काश्मिर प्रश्नावर मनं तोडणारं बोलणार नव्हतो, तर मनं जोडण्यासाठी जाणार होतो असं सांगताना अनुपम खेर यांनी कलाकारांना सीमा नसाव्यात, त्यांना आडकाटी नसावं असं मत व्यक्त केलं.
गुलाम अलींच्या भारतभेटीचं आपण स्वागतच करतो असं ते म्हणाले. मुंबईत गुलाम अलींना विरोध झाला, तर कोलकाता येथे लाखाच्या संख्येनं गुलाम अलींची मैफिल रंगली, हे भारताचं खरं रूप आहे असं खेर म्हणाले.
पाकिस्तानी कलाकार भारतात येतात, त्याबद्दल माझी काहीच हरकत नाहीये, कलेच्या क्षेत्रात अशी देवाणघेवाण व्हायलाच हवी असंही खेर यांनी स्पष्ट केलं. माझ्या न जाण्यामुळे ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी पाकिस्तानमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं, त्यांच्यासाठी मला वाईट वाटत असल्याचं खेर म्हणाले.