शहरं
Join us  
Trending Stories
1
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
2
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
3
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
4
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
5
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
6
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
7
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
8
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर?
10
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
11
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...
12
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
13
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
14
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
15
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल
16
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
17
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
18
हृदयद्रावक! CAF जवानाकडून साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, कारण अस्पष्ट
19
पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड!
20
“राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”; काँग्रेस करणार राज्यभर आंदोलन

काय आहे डिजिटल कृषी मिशन? ज्याला सरकारनं दिली मंजुरी; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 7:01 PM

Digital Agriculture Mission : अश्विनी वैष्णव यांच्या मते, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या धर्तीवर डिजिटल कृषी मिशन तयार केले जात आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. सरकार डिजिटल कृषी मिशन सुरू करत आहे. यासाठी २८१७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आणखी सहा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. दरम्यान, अश्विनी वैष्णव यांच्या मते, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या धर्तीवर डिजिटल कृषी मिशन तयार केले जात आहे.

डिजिटल कृषी मिशन म्हणजे काय?डिजिटल कृषी मिशन, भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि कृषी उत्पादकता वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, बियाण्याची गुणवत्ता, कीटकनाशकांचा वापर आणि बाजारपेठेची माहिती अशा विविध कृषी संबंधित सेवा ऑनलाइन मिळतील.

काय आहे डिजिटल कृषी मिशनचा उद्देश?या मिशनचा उद्देश शेतकऱ्यांना डिजिटल उपकरणे आणि प्लॅटफॉर्मद्वारे कृषी संबंधित माहिती आणि सेवा प्रदान करून सक्षम बनवणे आहे. तसेच, प्रगत कृषी तंत्र, जलस्रोतांचे उत्तम व्यवस्थापन आणि जमिनीची सुपीकता वाढवून कृषी उत्पादकता वाढवणे. शेतीवरील खर्च कमी करण्याबरोबरच नवोपक्रमाला प्रोत्साहन देणे हेदेखील त्याच्या उद्दिष्टांमध्ये समाविष्ट आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत काय झाले?अश्विनी वैष्णव म्हणाले, "आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी सात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामधील एक डिजिटल कृषी मिशन आहे. शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या धर्तीवर हे विकसित केले जात आहे. काही चांगले पायलट प्रोजेक्ट्स सुरू झाले आहेत. त्याच आधारावर एकूण २८१७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डिजिटल अॅग्रीकल्चर मिशनची स्थापना केली जाईल."

इतर कोणत्या योजना मंजूर झाल्या?मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या इतर योजनांमध्ये अन्न आणि पोषण सुरक्षेशी संबंधित योजनेचाही समावेश आहे. यासाठी ३९७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचे उद्दिष्ट २०४७ पर्यंत शेतकऱ्यांना हवामान बदलासाठी तयार करणे आहे, जेणेकरून अन्न आणि पौष्टिक सुरक्षा सुनिश्चित करता येईल. याशिवाय फलोत्पादन विकासासाठी ८६० कोटी रुपयांच्या योजनेलाही मान्यता देण्यात आली आहे. तसेच, कृषी विज्ञान केंद्रांच्या बळकटीकरणासाठी १२०२ कोटी रुपये आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनासाठी १११५ कोटी रुपयांच्या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. यासोबतच पशुधन आरोग्य आणि उत्पादनासाठी १७०२  कोटी रुपयांच्या योजनेलाही मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :Agriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवFarmerशेतकरी