शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

काय आहे डिजिटल कृषी मिशन? ज्याला सरकारनं दिली मंजुरी; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 19:02 IST

Digital Agriculture Mission : अश्विनी वैष्णव यांच्या मते, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या धर्तीवर डिजिटल कृषी मिशन तयार केले जात आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. सरकार डिजिटल कृषी मिशन सुरू करत आहे. यासाठी २८१७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आणखी सहा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. दरम्यान, अश्विनी वैष्णव यांच्या मते, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या धर्तीवर डिजिटल कृषी मिशन तयार केले जात आहे.

डिजिटल कृषी मिशन म्हणजे काय?डिजिटल कृषी मिशन, भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि कृषी उत्पादकता वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, बियाण्याची गुणवत्ता, कीटकनाशकांचा वापर आणि बाजारपेठेची माहिती अशा विविध कृषी संबंधित सेवा ऑनलाइन मिळतील.

काय आहे डिजिटल कृषी मिशनचा उद्देश?या मिशनचा उद्देश शेतकऱ्यांना डिजिटल उपकरणे आणि प्लॅटफॉर्मद्वारे कृषी संबंधित माहिती आणि सेवा प्रदान करून सक्षम बनवणे आहे. तसेच, प्रगत कृषी तंत्र, जलस्रोतांचे उत्तम व्यवस्थापन आणि जमिनीची सुपीकता वाढवून कृषी उत्पादकता वाढवणे. शेतीवरील खर्च कमी करण्याबरोबरच नवोपक्रमाला प्रोत्साहन देणे हेदेखील त्याच्या उद्दिष्टांमध्ये समाविष्ट आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत काय झाले?अश्विनी वैष्णव म्हणाले, "आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी सात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामधील एक डिजिटल कृषी मिशन आहे. शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या धर्तीवर हे विकसित केले जात आहे. काही चांगले पायलट प्रोजेक्ट्स सुरू झाले आहेत. त्याच आधारावर एकूण २८१७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डिजिटल अॅग्रीकल्चर मिशनची स्थापना केली जाईल."

इतर कोणत्या योजना मंजूर झाल्या?मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या इतर योजनांमध्ये अन्न आणि पोषण सुरक्षेशी संबंधित योजनेचाही समावेश आहे. यासाठी ३९७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचे उद्दिष्ट २०४७ पर्यंत शेतकऱ्यांना हवामान बदलासाठी तयार करणे आहे, जेणेकरून अन्न आणि पौष्टिक सुरक्षा सुनिश्चित करता येईल. याशिवाय फलोत्पादन विकासासाठी ८६० कोटी रुपयांच्या योजनेलाही मान्यता देण्यात आली आहे. तसेच, कृषी विज्ञान केंद्रांच्या बळकटीकरणासाठी १२०२ कोटी रुपये आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनासाठी १११५ कोटी रुपयांच्या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. यासोबतच पशुधन आरोग्य आणि उत्पादनासाठी १७०२  कोटी रुपयांच्या योजनेलाही मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :Agriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवFarmerशेतकरी