शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

‘सीएए’ अंमलबजावणीवरून काँग्रेसमध्ये मतभेद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 07:43 IST

राज्य सरकारे या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार देऊ शकतात का, यावरून काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात केरळ आणि पंजाब या राज्यांच्या विधानसभांनी ठराव केले असले तरी राज्य सरकारे या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार देऊ शकतात का, यावरून काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे.  हे लक्षात घेऊन पक्षाची नक्की भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत यावर ठराव करण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी रविवारी असे म्हटले होते की, भारत हे संघराज्य आहे व त्यात राज्यांनाही काही अधिकार आहेत. केंद्राने केलेला कायदा अयोग्य वाटत असल्यास त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा राज्यांना अधिकार आहे. त्यानुसार काही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ अन्वये दावे दाखल केले आहेत. त्यांचा निकाल होईपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी करण्याची सक्ती राज्यांवर केली जाऊ शकत नाही.मात्र, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा व स्वत: नामवंत वकील असलेल्या कपिल सिबल व सल्मान खुर्शिद या काँग्रेस नेत्यांनी मात्र याहून वेगळे मत व्यक्त केले. त्यांचे म्हणणे असे की, या कायद्याला राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणे ठीक आहे; पण जोपर्यंत न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत हा कायदा लागू असणार आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करावीच लागेल. तसे न करणे हे राज्यघटनेच्या विरुद्ध होईल. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी असे संकेत दिले की, मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या काँग्रेसशासित राज्यांच्या विधानसभांमध्येही या कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर करून घेण्याचा विचार सुरू आहे. पंजाब विधानसभेतही असा ठराव करण्यात आला असून राज्य सरकार लवकरच सर्वोच्च न्यायालयातही दावा दाखल करील, असे मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्र सिंग यांनी सांगितले आहे. (वृत्तसंस्था)‘एनपीआर’च्या कामात केरळचा असहकारथिरुवनंतपूरम : येत्या १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात जनगणना करणारे प्रगणक घरोघरी जातील तेव्हा त्यासोबतच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठीही (एनपीआर) माहिती गोळा करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. मात्र, केरळमध्ये फक्त जनगणनेचे काम केले जाईल व ‘एनपीआर’ची माहिती गोळा केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी सोमवारी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला. जनगणना महानिरीक्षकांना औपचारिक पत्र पाठवून राज्याचा हा निर्णय कळविला जाईल, असेही विजयन म्हणाले.प. बंगाल विधानसभाही ‘सीएए’विरोधी ठराव करणारकोलकाता : केंद्र सरकारने ‘सीएए’ कायदा मागे घ्यावा, अशी मागणी करणारा ठराव प. बंगाल विधानसभेतही येत्या काही दिवसांत मंजूर केला जाईल, असे त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले आणि ईशान्येकडील इतर राज्यांनीही असे ठराव करावेत, असे आवाहन केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकcongressकाँग्रेस