शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

आमदारांच्या अपात्रतेचे त्रांगडे; सुप्रीम कोर्टात १ ऑगस्टला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 05:37 IST

पुढील सुनावणी पूर्वी शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाने येत्या २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : गेल्या एक महिन्यापासून शिवसेनेच्या काही आमदारांच्या अपात्रतेतेवरून उठलेल्या राजकीय वादावर बुधवारी सुप्रीम कोर्टात निर्णय होऊ शकला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १ ऑगस्टला होणार असून, त्यापूर्वी शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाने येत्या २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश  कोर्टाने दिले. सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांच्या नेतृत्वाखालील तसेच न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. 

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी एकनाथ शिंदेनिष्ठ १६ आमदारांवर बजावलेली अपात्रतेची नोटीस, विधानसभा अध्यक्षांची निवड, विधानसभेतील मुख्य प्रतोदाच्या नियुक्तीला अध्यक्षांची मान्यता व विश्वासमत घेण्याचा राज्यपालांचा निर्णय या चार मुद्द्यांवर बुधवारी निकाल अपेक्षित होता. उद्धव ठाकरे गटाकडून बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी झिरवाळ यांच्या निर्णयाचे समर्थन केले. शिंदे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली.

‘निर्णयास उशीर लावणे योग्य नाही’

हरीश साळवे यांनी सुनावणी एक आठवड्यासाठी पुढे ढकलावी, अशी मागणी केली. या मागणीला कपिल सिब्बल यांनी तीव्र विरोध केला. १०व्या परिशिष्टानुसार हे सदस्य अपात्र ठरत असताना यावर निर्णय घेण्यास उशीर लावणे योग्य ठरणार नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली.

हंगामी अपात्र घोषित करा: अभिषेक मनू सिंघवी

राज्यघटनेच्या १० परिशिष्टातील तरतुदीनुसार एखाद्या पक्षातून दोन तृतीयांश सदस्यांसह गट वेगळा झाला तरी त्याला दुसऱ्या पक्षात विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही. बंडखोर गट अद्यापही दुसऱ्या पक्षात विलीन झालेला नाही. त्यामुळे शिंदे सरकारबाबत संमत झालेले विश्वास मतसुद्धा बेकायदेशीर आहे. या बंडखोरांना अंतिम निर्णयाप्रत येईपर्यंत न्यायालयाने हंगामी अपात्र घोषित करावे, अशी मागणी सिंघवी यांनी केली.

लक्ष्मणरेषेचे उल्लंघन नाही: हरीश साळवे

शिंदे गटातील बहुसंख्य आमदारांनी आपला नेता बदलला आहे. ही बंडखोरी नाही. पक्षाच्या बहुसंख्य सदस्यांना नेता बदलला असेल तर ते बेकायदेशीर कसे ठरेल, असा त्यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, त्यांनी जे केले ते लोकशाही मूल्यांना आहे. त्यांनी पक्षांतरबंदीच्या लक्ष्मणरेषेचे उल्लंघन केलेले नाही. लोकशाहीत लोक पंतप्रधानांनाही पदावरून हटवू शकतात. नेत्याने बहुमताइतके समर्थक गोळा केले व पक्ष न सोडता विद्यमान नेत्यास आव्हान दिले तर यास पक्षांतर म्हणता येत नाही.

विस्तारित खंडपीठापुढे सुनावणीसंदर्भात विचार करू : सरन्यायाधीश     

- शिवसेना व बंडखोर आमदारांचा गट या दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांनी माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

- यात खटल्यातील काही मुद्दे अत्यंत संवेदनशील असून, त्यासाठी घटनात्मक तरतुदींचा अधिक विचार करावा लागेल. त्यामुळे मला वाटते, विस्तारित घटनापीठापुढे याची सुनावणी होणे अधिक सयुक्तिक होईल. हे माझे ढोबळ असे मत आहे. 

- या संदर्भात निर्णय घेतलेला नाही, असेही सरन्यायाधीशांनी या वेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे