शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लोकसंख्या नियंत्रणाकडे आणीबाणीपासून दुर्लक्ष, एन. आर. नारायण मूर्ती यांची खंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 07:30 IST

इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी भारताची लोकसंख्या वाढ आणि देशाच्या शाश्वततेवरील त्याचा संभाव्य परिणाम याबद्दल चिंता व्यक्त केली.

प्रयागराज : "आणीबाणीच्या काळापासून भारताने लोकसंख्या नियंत्रणाकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही, ज्यामुळे देशाच्या शाश्वततेला मोठा धोका आहे," असे सांगत इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी भारताची लोकसंख्या वाढ आणि देशाच्या शाश्वततेवरील त्याचा संभाव्य परिणाम याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी जमिनीची उपलब्धता आणि आरोग्य सेवेशी संबंधित गंभीर आव्हानांवरही भर दिला. 

येथील मोतीलाल नेहरू राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (एमएनएनआयटी) दीक्षांत समारंभात संबोधित करताना ते म्हणाले, "भारताला लोकसंख्या, दरडोई जमिनीची उपलब्धता आणि आरोग्य सुविधांशी संबंधित महत्त्वाच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. आणीबाणीच्या काळापासून, आम्ही भारतीयांनी लोकसंख्या नियंत्रणाकडे पुरेसे लक्ष दिले नाही. यामुळे आपल्या देशाला टिकाव धरणे अवघड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

तुलनेत अमेरिका, ब्राझील आणि चीनसारख्या देशांमध्ये दरडोई जमिनीची उपलब्धता खूप जास्त आहे." मूर्ती यांनी पदवीधरांना उच्च आकांक्षा बाळगा, मोठी स्वप्ने पाहा आणि त्या स्वप्नांचे सत्यात रूपांतर करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे आवाहन केले. देशाच्या प्रगतीत योगदान देणे ही खऱ्या व्यावसायिकाची जबाबदारी आहे, हे योगदान कठोर परिश्रम आणि समर्पणावर अवलंबून असते, असे ते म्हणाले.

भावी पिढीसाठी बलिदान आवश्यक "एका पिढीने भावी पिढीचे जीवन सुधारण्यासाठी अनेक बलिदान दिले पाहिजेत. माझ्या प्रगतीसाठी माझे आई-वडील, भावंड आणि शिक्षक यांनी मोठे बलिदान दिले आणि येथे प्रमुख पाहुणे म्हणून माझी उपस्थिती हा त्यांचा त्याग व्यर्थ गेला नाही याचा पुरावा आहे." असे ते म्हणाले.

टॅग्स :Indiaभारत