शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

स्मार्ट सिटी चे रूपांतर रावणाच्या लंकेत नको : राज्यपाल सोलंकी

By admin | Published: September 24, 2015 1:07 AM

एकविसावे शतक विकास आणि तंत्रज्ञानाचे शतक आहे. सर्वांनाच सुंदर शहरे आणि सर्वांगिण विकास हवा आहे. लोकजीवनाचे रहाणीमान सुधारतांना निसर्ग आणि पर्यावरणाची हानी व्हायला नको

नवी दिल्ली : एकविसावे शतक विकास आणि तंत्रज्ञानाचे शतक आहे. सर्वांनाच सुंदर शहरे आणि सर्वांगिण विकास हवा आहे. लोकजीवनाचे रहाणीमान सुधारतांना निसर्ग आणि पर्यावरणाची हानी व्हायला नको, सुंदर शहरांंबरोबर सुंदर जंगलेही हवीत. स्मार्ट शहरे बनवता बनवता रावणाच्या लंकेची निर्मिती व्हायला नको? सरकारने याची काळजी घ्यायला हवी, असा इशारा हरयाणाचे राज्यपाल कप्तानसिंग सोलंकी यांनी दिला.दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबच्या सभागृहात कल्पक व क्रियाशील मराठी सनदी अधिकारी व हरयाणातल्या जिंद चे उपायुक्त अजित जोशी यांच्या ‘बर्डस आॅफ बिंदावास’ या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळयाचे प्रमुख अतिथी या नात्याने राज्यपाल सोलंकी बोलत होते. सोहळयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांचीही शुभेच्छापर भाषणे झाली.हरयाणाच्या जज्झर जिल्ह्यात बिंदावास पक्षी व वन्यजीवांचे विलक्षण सुंदर अभयारण्य आहे. जज्झरचे जिल्हाधिकारी असतांना अजित जोशींनी बिंदावास अभयारण्याचा कल्पकतेने वेध घेतला. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून २६0 प्रकारच्या पक्षांचे आवाज, त्यांच्या वेधक हालचाली व मनोहारी छायाचित्रे त्यांनी टिपली. या कार्यात त्यांना सतिश पांडे, निरंजन संत व प्रमोद देशपांडेंची सक्रीय मदत झाली. बर्डस आॅफ बिंदावास या संग्राह्य पुस्तकाची त्यातूनच निर्मिती झाली.जोशींच्या संकल्पनेची स्तुती करताना जावडेकर म्हणाले, निसर्ग कायम नवनवे पक्षी, नवनव्या वनस्पतींना जन्म देतो, निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे. सरकारी फायलीत अडकून न पडता जोशींसारख्या सनदी अधिकाऱ्याने छंद म्हणून त्याचा अचूक वेध घेतला ही कौतुकास्पद बाब आहे. जलवायु परिवर्तनाच्या कालखंडात भारतात पर्यावरणाचे रक्षण हे एक आव्हान आहे. ‘बर्डस आॅफ बिंदावास’ हे जोशींचे पुस्तक,वेबसाईट व मोबाईल अ‍ॅप त्या विषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत करील. (विशेष प्रतिनिधी)