शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

तहान लागल्यावरच विहीर खणू नका - सर्वोच्च न्यायालय

By admin | Published: October 06, 2016 5:39 AM

यंदा पाऊस आणि पिकपाण्याची परिस्थिती गेल्या वर्षाइतकी वाईट नसली तरीही देशाच्या काही भागांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही.

नवी दिल्ली : यंदा पाऊस आणि पिकपाण्याची परिस्थिती गेल्या वर्षाइतकी वाईट नसली तरीही देशाच्या काही भागांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. तेव्हा गतवर्षाप्रमाणे तहान लागल्यावर विहीर खणण्याची चूक पुन्हा न करता जेथे पाऊस कमी झाला आहे अश भागांतील संभाव्य दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी वेळीच तयार राहा, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले.गेल्या वर्षी १३ राज्यांत पडलेल्या भीषण दुष्काळाच्या संदर्भात ‘स्वराज अभियान’ या संघटनेने केलेली जनहित याचिका अजूनही प्रलंबित आहे. न्या. एम. बी. लोकूर व न्या. एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठापुढे यावर बुधवारी पुन्हा सुनावणी झाली तेव्हा यंदाही अनेक जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झालेला आहे व सरकार याही वेळ गाफील राहिले तर तेथे यंदाही दुष्काळी स्थिती गंभीर रूप धारण करू शकते, असे सांगितले गेले तेव्हा न्यायालयाने वरीलप्रमाणे मत व्यक्त केले. सरकारला उद्देशून न्यायाधीश म्हणाले की, आम्हाला तुमच्या दृष्टिकोनाची चिंता वाटते. तुम्ही तुमची मानसिकता बदलायला हवी. वेळीच दुष्काळ जाहीर न करण्याची गेल्या वर्षी ची चूक यंदा पुन्हा करू नका. (लोकमत न्यूज नेटवर्क)

यंदा परिस्थिती गेल्या वर्षीइतकी वाईट नाही, हे खरे, पण गाफील राहू नका, तहान लागल्यावर विहीर खणू नका. वेळीच पावले उचला, एवढेच आम्हाला म्हणायचे आहे.- न्या. लोकूर व न्या. रमणा, (सरकारला उद्देशून)