शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहात पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
4
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
6
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
7
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
8
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
9
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
10
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
11
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
12
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
13
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
14
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
15
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
16
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
17
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
18
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
19
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
20
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?

‘डिजिटल इंडिया’ नको, शेतकऱ्यांकडे लक्ष द्या!

By admin | Published: February 22, 2016 1:19 AM

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप्स यासारख्या अभियानांची धडाक्यात सुरुवात केली असली तरी यापेक्षा सरकारने शेतकरी आणि एकूणच कृषी

- नितीन अग्रवाल, नवी दिल्लीकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप्स यासारख्या अभियानांची धडाक्यात सुरुवात केली असली तरी यापेक्षा सरकारने शेतकरी आणि एकूणच कृषी क्षेत्राकडे लक्ष द्यावे, असे भारतीयांना वाटत आहे. केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणात लोकांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप्स यापेक्षा सरकारने कृषी क्षेत्रास प्राधान्य द्यावे, असे लोकांना वाटते आहे.अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या सर्वेक्षणात चार प्रमुख वर्ग, चार क्षेत्र. समाजाचे चार घटक आणि सरकारी योजनांबाबत लोकांचे मत विचारले गेले होते. अर्थसंकल्पात शेतकरी, युवा व महिला, मध्यमवर्गीय व निम्न वर्ग यापैकी कुणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जायला हवे, असे मंत्रालयाने विचारले होते. सर्वेक्षणात सामील लोकांपैकी सर्वाधिक ५७ टक्के लोकांनी शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली. २७ टक्के लोकांनी मध्यमवर्ग, १० टक्के लोकांनी महिला व युवा तसेच ६ टक्के लोकांनी निम्न वर्गास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कृषी उत्पादन व पायाभूत आराखडा, सेवा आणि स्टार्ट-अप्स यातही लोकांनी कृषीला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे मत व्यक्त केले.मायक्रो ब्लॉगिंग साईट टिष्ट्वटरवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात सुमारे १५,५०० लोकांनी भाग घेतला. शहरी लोकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या टिष्ट्वटरवर कृषी आणि शेतकरी यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त झाल्याने सरकारलाही धक्का बसला. डिजिटल तंत्राचा वापर करणाऱ्यांंनीच डिजिटल इंडियाबाबत अनास्था दाखवणे, याबाबतही सरकारने आश्चर्य व्यक्त केले.