शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

राजकीय विरोधकांचा द्वेष करू नये

By admin | Published: November 15, 2014 1:59 AM

कोणत्याही नेत्याने आपल्या राजकीय प्रतिस्पध्र्याविषयी द्वेषभावना वा शत्रुत्व ठेवू नये, तसेच पक्षातील कार्यकत्र्याच्या मनात भयही उत्पन्न करू नये,

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानपिचक्या : पं. नेहरू जयंती, नेहरू-गांधी कुटुंबाची अनुपस्थिती
नवी दिल्ली : कोणत्याही नेत्याने आपल्या राजकीय प्रतिस्पध्र्याविषयी द्वेषभावना वा शत्रुत्व ठेवू नये, तसेच पक्षातील कार्यकत्र्याच्या मनात भयही उत्पन्न करू नये, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी येथे केले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्ष शरसंधान साधले.
 पं. जवाहरलाल नेहरू यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त नेहरू स्मृती संग्रहालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारच्या या कार्यक्रमाला नेहरू-गांधी कुटुंबातील मात्र कोणीही उपस्थित नव्हते. लोकसभेचे पक्षनेते मल्लिकाजरुन खरगे हे काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून हजर   होते.  
कार्यक्रमानंतर पत्रकारांनी याबाबतीत प्रश्न विचारले असता त्यांनी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा नामोल्लेख न करता त्यांचा समाचार घेतला. राहुल गांधी यांनी, क्रोधी लोक देश चालवीत आहेत, असे म्हणून पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाबाबत, केवळ फोटो छापून आणण्यासाठी केले जात असल्याचे वक्तव्य केले होते. 
त्याचबरोबर रस्त्यांची स्वच्छता होते आहे, तर दुसरीकडे समाजात वैरभाव पेरला जातो आहे, समाजाच्या पायालाच कमकुवत केले जात आहे, अशी टीकाही केली होती. यावर सिंग यांनी, भारतावर संकुचित मनोवृत्तीने राज्य केले जाऊ शकत नाही ही बाब नेहरूंनी जाणली होती, त्यामुळे त्यांच्या मनात विरोधी पक्षाविषयी कटुभाव कधी नव्हता, असा टोला लगावला. 
राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांना शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती मोहंमद हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शांतिवनात जाऊन नेहरूंना श्रद्धांजली वाहिली.
 जेव्हा देश स्वच्छ होईल तेव्हा त्यांची मनेही स्वच्छ होतील. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा हा एक भाग आहे. जर राहुल गांधींना हे समजत नसेल तर त्याला कोणीच काही करू शकत  नाही, अशा शब्दांत केंद्रीयमंत्री    प्रकाश जावडेकरांनी राहुलवर टीकास्त्र सोडले.
 
असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करू नये
च्देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी आपल्या राजकीय विरोधकांविषयी कधीही वैरभाव बाळगला नाही, असे प्रतिपादन करून सिंह यांनी 1963 सालच्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात त्यांनी रा. स्व. संघाला आमंत्रित केले होते या घटनेची आठवण सांगितली. 
 
च्आपल्या राजकीय विरोधकांप्रती द्वेषभाव नसावा, नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली जाऊ नये व अनावश्यक वक्तव्ये करून देशात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जाऊ नये, असे ते म्हणाले.
 
च्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पं. जवाहरलाल नेहरूंना आपली श्रद्धांजली अर्पण केली. ऑस्ट्रेलियाच्या दौ:यावर असलेल्या मोदींनी सोशल नेटवर्किग साईट टि¦टरवर, आपण नेहरूंना श्रद्धांजली वाहत असल्याचे नोंदविले आहे. 
 
मोदींची टि¦टरवर श्रद्धांजली
च्स्वातंत्र्यलढय़ातील त्यांच्या योगदानाला व त्यांच्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला देश नेहमीच स्मरणात ठेवील, असे पुढे म्हटले आहे.