शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

विरोध करणाऱ्यास देशद्रोही म्हणणाऱ्यांना मतदान नको, 200 शास्त्रज्ञांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 16:38 IST

विरोधकांना देशद्रोही ठरवणे आणि जात, धर्म, भाषेच्या आधारावर देशातील नागरिकांत फूट पाडणे ही पद्धत केवळ शास्त्रज्ञांसाठीच नसून लोकशाहीसाठीही धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता देशातील 200 शास्त्रज्ञांनीही मतदारांना आवाहन केलं आहे. आपल्या विरोधकास देशद्रोही म्हणणाऱ्यांना मतदान करू नका, असे आवाहन देशातील 200 वैज्ञानिकांनी केलंय. देशाच्या प्रमुख संस्थेमधील वैज्ञानिकांनी हे आवाहन केलं आहे. तसेच आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करुन मतदान करा, असेही त्यांनी म्हटले. मात्र, आपल्या आवाहनामध्ये कुठल्याही पक्षाचा उल्लेख या वैज्ञानिकांनी केला नाही.  

विरोधकांना देशद्रोही ठरवणे आणि जात, धर्म, भाषेच्या आधारावर देशातील नागरिकांत फूट पाडणे ही पद्धत केवळ शास्त्रज्ञांसाठीच नसून लोकशाहीसाठीही धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 3 एप्रिल रोजी शास्त्रज्ञांकडून हस्ताक्षराद्वारे करण्यात आलेल्या आवाहनातून ही सूचना मांडण्यात आली आहे. गेल्या 5 वर्षात निवडून आलेल्या राजकीय नेत्यांकडून शास्त्रज्ञांच्या विचारप्रणालीवर हल्ला करण्यात आला आहे. शिक्षण, विज्ञान आणि लोकशाहीबाबात हे लोक टीकात्मक धोरण अवलंबतात. त्यामुळे याबाबतही शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. 

इंस्टीट्यूट ऑफ मॅथमेटीकल सायन्सेस, चेन्नई येथील ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ सिताभ्रा सिन्हा यांनी 1799 मध्ये स्पॅनिश आर्टिस्ट फ्रांसिस्को गोया यांच्या छायाचित्राचा अहवाल देत म्हटले की, गोयाच्या शब्दात सांगायचे झाल्यास, जेव्हा चर्चा बंद होते आणि तर्क झोपी जाते, तेव्हा राक्षसाचा जन्म होतो. नॅशनल मेडिकल ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्समधील एक ख्यातनाम प्राध्यापक पार्थ मजदूमदार यांनी म्हटले की, एका शास्त्रज्ञाच्या नाते मला त्या लोकांपासून सावधान राहिले पाहिजे, जे विद्यार्थी आणि समाजाला विघातक बनवत आहेत. 

पुण्यातील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्चमधील प्राध्यापक सत्यजीत रथ म्हणाले की, शास्त्रज्ञांनी हे असामान्य पाऊल उचलण्याचं धाडस दाखवलं, कारण भारतच नाही तर जगभरात मागास दिसणारी प्रतिगामी राजकीय विचारधारा आमच्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. दरम्यान, यापूर्वी काही कलाकार आणि माजी सैनिकांमध्ये या बाबीवरुन मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता, शास्त्रज्ञांनीही याबाबत देशातील स्थिती वर्णन करताना, कुठल्याही पक्षाचे नाव न घेता मतदारांना आवाहन केलंय.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019scienceविज्ञानVotingमतदान