शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दुष्काळग्रस्त भागात सामने नकोत

By admin | Published: October 15, 2016 4:52 AM

सर्व जबाबदारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर (एमसीए) ढकलू पाहणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) शुक्रवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले.

मुंबई : सर्व जबाबदारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर (एमसीए) ढकलू पाहणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) शुक्रवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले. क्रिकेट केवळ मैदानावर किंवा स्टेडियममध्ये खेळला जातो, असे समजू नका. मैदानाबाहेरही त्याचे परिणाम  होतात. त्यामुळे बाहेरच्यांचाही विचार करा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बीसीसीआयची कानउघाडणी करत दुष्काळी भागांत सामने न ठेवण्याची सूचनाही केली.दरवर्षी राज्यातील काही भागांतील नागरिकांना दुष्काळाला सामोरे जावे लागते, ही समस्या कायमस्वरूपी मिटावी यासाठी राज्य सरकारला उपाययोजना आखण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. या याचिकांमध्येच ‘लोकसत्ता मूव्हमेंट’ या एनजीओने आयपीएलचे सामने राज्यात खेळू देऊ नयेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली आहे.दुष्काळ संपला असून आयपीएलचे सामनेही संपले आहेत, त्यामुळे आता बीसीसीआयला यामधून प्रतिवादी म्हणून वगळावे, अशी विनंती शुक्रवारच्या सुनावणीत बीसीसीआयच्या वकिलांनी खंडपीठाला केली. बीसीसीआयची ही विनंती मान्य करण्यास खंडपीठाने नकार दिला. (प्रतिनिधी)