शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

पाणी वाया घालवू नका, प्रत्येक थेंब महत्वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By admin | Published: May 22, 2016 11:41 AM

पाणी वाचवा, पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नका. पाणी वाचवणे आणि जंगलाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २२ - पाणी वाचवा, पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नका. पाणी वाचवणे आणि जंगलाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. मी प्रसारमाध्यमांना विनंती करीन की, त्यांनी पाणी वाचवण्यासाठी जनतेमध्ये जागरुकता निर्माण करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारच्या 'मन की बात' मध्ये बोलताना म्हणाले. 
 
दर महिन्याच्या चौथ्या रविवारी पंतप्रधान मन की बात मधून देशवासियांना संबोधित करतात. दुष्काळाचा सामना करण्यासाठी अनेक राज्यांनी चांगले उपाय योजले, गुजरात आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग केला असे मोदींनी सांगितले.  
 
दुष्काळग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची संधी मिळाली, सर्वांना एकत्र भेटण्याऐवजी मी प्रत्येकाची स्वतंत्र भेट घेतली असे मोदींनी सांगितले. आगामी रिओ ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर त्यांनी क्रीडा क्षेत्रातील घटनांचाही आढावा घेतला. देशाच्या क्रीडा क्षेत्रासमोर आज अनेक आव्हाने आहेत हे खरे आहे पण रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी चाललेल्या क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळेल असे वातावरण आपण तयार केले पाहिजे असे मोदी म्हणाले. देशात फुटबॉलची लोकप्रियताही वाढत आहे असे मोदींनी सांगितले. 
 
रोख रक्कमेचा वापर कसा कमी होईल यासाठी कॅशलेस सोसायटीच्या दिशेने जगाचा प्रवास सुरु आहे, जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.  कॅशलेस सोसायटीच्या संकल्पना यशस्वी ठरेल  असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.