शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Doctors Day : सात महिन्यांच्या गर्भवती, तरीही दररोज 60 किमीचा प्रवास करून बजावतायेत कोरोनाग्रस्तांची सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 15:51 IST

पृथ्वीवर देवाचे रूप. म्हणजेच, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी.

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून ते कोरोनाविरूद्ध युद्ध करीत आहेत. फरक फक्त एवढाच आहे की, त्यांच्या वर्दीचा रंग निळा आणि पांढरा आहे.घरगुती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सकारात्मक आणि निरोगी ठेवण्याचे काम करत आहेत.

फाजिल्का : कोरोना ड्युटी करत असलेल्या डॉक्टर सुनीता कंबोज या लोकांनी घरीच थांबण्याचा आणि मास्क घालण्याचा सल्ला देतात. तसेच, सात महिन्यांच्या गर्भवती असूनही कोरोना रुग्णांच्या काळजीसाठी जलालाबाद ते फाजिल्का सिव्हिल हॉस्पिटल असा दररोज 60 किलोमीटर लांबीचा प्रवास करतात. 

डॉ. सुनीता कंबोज यांना घरी परत यायला रात्रीचे 12 सुद्धा वाजत होते, पण त्यांच्यासाठी कर्तव्य सर्वात महत्त्वाचे होते. दरम्यान, त्यांच्या या सर्वोत्तम आरोग्य सेवासाठी त्यांना येत्या 15 ऑगस्ट रोजी पोलीस डीजीपी पुरस्कार देण्यात येणार आहे.

डॉ. सुनीता यांनी सांगितले की, "कोरोना कालावधीत सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे, कोरोना रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास पाहून त्यांना क्वारंटाईन करणे, नमुने घेणे, फील्ड वर्क, राज्य समन्वय साधणे आहे. विशेष म्हणजे, कोरोना रुग्णाची चांगली काळजी घेण्यात सक्षम झाल्याने मला देखील आनंद होतो."

पृथ्वीवर देवाचे रूप. म्हणजेच, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी. तीन महिन्यांपासून ते कोरोनाविरूद्ध युद्ध करीत आहेत. फरक फक्त एवढाच आहे की, त्यांच्या वर्दीचा रंग निळा आणि पांढरा आहे. न थांबता सतत कर्तव्य बजावणे. घरगुती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सकारात्मक आणि निरोगी ठेवण्याचे काम करत आहेत. एकच ध्येय म्हणजे या साथीच्या रोगाचा पराभव करणे. 

सर्वप्रथम रूग्ण त्यानंतर कुटुंब, असे लुधियानाचे डॉ. अनमोल रत्न आणि त्यांची पत्नी डॉ. मीनल गुप्ता यांनी सांगितले. सुरुवातीपासूनच सिव्हिल हॉस्पिटलचे ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. अनमोल रत्न आयसोलेशन वॉर्डमध्ये तैनात आहेत. ते दररोज कोरोना रुग्णांचे नमुने घेतात. 4 वर्षांच्या मुलाला भेटू शकत नाही. लोकांचे सहकार्य आपल्याला पुढे काम करण्याचे धैर्य देते आणि कुंटुब पाठिंबा देते, असे डॉ. अनमोल रत्न सांगतात.

याचबरोबर, डॉ. अनमोल रत्न यांची पत्नी डॉ. मीनल गुप्ता या डीएमसीमध्ये माइक्रोबायोलॉजिस्ट आहेत. कोरोना रुग्णांचे नमुने तपासण्यात मोठे योगदान देत आहेत. दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारी (दि.30) 5 लाख 66 हजार 840 झाली आहे. तामिळनाडूमध्ये रुग्णांची संख्या सतत वाढत असून, आता ते राज्य दिल्लीपेक्षा पुढे गेले आहे.

महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण आता तामिळनाडूमध्ये आहेत. देशात 24 तासांमध्ये 418 रुग्ण मरण पावले असून, कोरोनाच्या बळींची संख्या त्यामुळे 16 हजार 893 वर गेली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर